Shivsena: ते संजय राऊत कोण होते? त्यांचा पगार किती होता? किंवा नारायण राणेंचे व्यवसाय कोणते?: शिवाजी माने

0

हिंगोली,दि.२१: Shivsena: केंद्रीयमंत्री नारायण राणे व शिवसेनेत वाद सुरू आहे. भाजपा शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना नेते संजय राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीत आता शिवसेनेचे हिंगोलीचे माजी खासदार शिवाजी माने यांनी फेसबुक पोस्ट लिहून सेनेला घरचा आहेर दिला आहे. माजी खासदार माने यांनी केलेली फेसबुक पोस्ट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत. ईडीचा घोटाळा उघड करणार असल्याचेही राऊत यांनी म्हटले होते.
‘ईडीचा घोटाळां जरूर काढा परंतु राज्यसभेत व लोकसभेत ही जनतेचे प्रश्न मांडा ईडीचे काय वाकडे होणार हे ही आम्हाला माहीत आहे. आज पर्यंत अधिकाऱ्यांचे काय झाले ते आत्ताच होणार आहे हे सर्वांनाच माहीत आहे. ही नवीन समाजकारणाची पद्धत पहावयास मिळते आहे. ज्याला आपण सुडाचे राजकारण म्हणू शकतो,’ असं शिवाजी माने यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

‘बरं आम्ही कुणाशी भांडत आहोत आपल्याशीच काँग्रेस व राष्ट्रवादी रिंगणाच्या बाहेरून मजा घेत आहे. अजित दादा वगळता या विषयावर कोणी भाष्य केलं. हे ऐकवण्यात किंवा वाचण्यात नाही. गोर- गरीबांना घरे देण्याचे सोडून आम्ही आमचीचं पाडापाडी करत आहोत. अश्याने काय साध्य होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहीती आहे. कोणी किती कष्टाने कमाई केली आहे? ते संजय राऊत कोण होते? त्यांचा पगार किती होता? किंवा नारायण राणेंचे व्यवसाय कोणते?,’ असा सवाल शिवाजी माने यांनी केला आहे.



तसंच, ‘राणे आता एवढ्या उशीरा खुनी दिसू लागलेतं त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवले होते. त्या वेळी ते काय धुतल्या तांदळासारखे होते काय? बरं साहेबांना संरक्षण देण्यासाठी त्यांनीच त्याच्या जिवाची पर्वा केली नव्हती हे विसरलात कां? मुबंईत जी शिवसेना वाढली ज्यात मोजून काही मंडळी होती त्यांत राणे होतेचं ना. मग शिळ्या कढीला ऊत काय आणतं आहात,’ असं म्हणत शिवसेनेचा घरचा आहेर दिला आहे.

‘कॉ. दत्ता सामंतापासूनच्या हत्येचा शोध घेत बसां कोण कोण गुन्हेगार व गुन्हा करण्यास मदत केली ते सर्व बाहेर येईल. शेवटी तुम्ही आम्ही सर्वच जण फाटक्या शिवसैनिकांच्या जीवावर मोठे झाले आहोत हे विसरून चाललोत हे मात्र नक्की, फाटक्यांचे राज्यं कधी येणार त्यांच स्वप्न कधी पुर्ण होणार? एक गोष्ट विसरू नका मुंबईला वाचविणारी मंडळीच आपआपसात भिडत आहेत व ती कशी संपेल याचीचं वाट काँग्रेस पहात आहे,’ अशा शब्दांत माजी खासदार शिवाजी माने यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here