चोरी दरोड्याच्या घटनेत मिळणार तात्काळ मदत,चोर दरोडेखोर होणार जागेवर जेरबंद

0

जिल्ह्यात होणार ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित

सोलापूर,दि.22 : जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या प्रयत्नातून, जिल्हा परिषद सोलापूर व जिल्हा ग्रामीण पोलीस दल व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सयुंक्त विद्यामाने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत आज माढा पोलीस स्टेशन हद्दीतील 39 गावांमधील सर्व पोलिसपाटील, सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य, सर्व पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांचेसाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे (18002703600) प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सदर कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून नागरिक उपस्थितीत राहिले.

पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोलफ्री नंबर 18002703600 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवले, सर्व सरपंच व नागरिकांनी यंत्रणेत पुढील 48 तासांत सहभागी होण्याचे आश्वासन दिले. सदर कार्यक्रमास तहसीलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी संताजी पाटील तसेच नगर पंचायत चे सर्व अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी, अभिजित धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक शाम बुवा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पोलीस स्टेशन चे उप पोलीस निरीक्षक किरण घोंगडे, महम्मद शेख तसेच सर्व बीट अंमलदार यांनी मेहनत घेवून कार्यक्रमाचे नियोजन केले.

ल्या 9 वर्षांत पुणे,नाशिक,सातारा,व अहमदनगर जिल्ह्यातील 3500 हून अधिक गावे व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाले आहेत. ग्रामस्थ आपापले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत आहेत. संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600 वर नोंदणी केलेल्या नागरिकाने आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईल वर ऐकू जातो. परिसरातील नागरिकांना घटनां घडत असतांनाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here