Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक दावा 

0

मुंबई,दि.25: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुंबईमधील जनआक्रोश मोर्चात खळबळजनक दावा केला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेबाबत एक सर्वात मोठे विधान केलं आहे. खरं म्हणजे अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही. ज्यांनी बलात्कार केला त्यांना वाचवण्यासाठी त्याला संपवण्यात आलं, असा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

अक्षय शिंदेला हालहाल करुन मारण्यात आले. त्याला ज्या अंतरावरुन गोळी मारली ते भयंकर आहे. निर्घृणपणे हत्या केली. त्याच्या हातात बेड्या होत्या, तो कसा हल्ला करणार? रिव्हॉलव्हरवर त्याच्या हाताचे ठसेच नाहीत. अरे अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही. त्यांनी केला त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेंला मारला. मात्र लोक बोलायला तयार नाहीत. बलात्काराची केस आहे समाज अंगावर येईल अशी त्यांना भिती वाटते,’ असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here