Mumbai Drugs case:मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला हा निर्णय

0

मुंबई,दि.23: मुंबई क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी (Mumbai Drugs case) गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. एनसीबीचे समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी मुंबई क्रूझ ड्रग पार्टीवर कारवाई करत शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अटक केल्यापासून राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ही कारवाईच बोगस असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. या कारवाई संदर्भात अनेक पुरावे मलिक यांनी दिले होते.

मुंबई ड्रग्ज प्रकरणी एनसीबीवर प्रश्नचिन्ह उभे राहू लागले होते. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानसह इतरांना एनसीबीने अटक केली होती. या प्रकरणी एनसीबी आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहणार असल्याची चर्चा आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) आर्यन खान आणि इतर काही आरोपींना मुंबई क्रूझ ड्रग्ज (Mumbai Drugs case) प्रकरणात जामीन मंजूर केला होता. आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, तसेच या प्रकरणात एनसीबीकडून ज्या व्हॉट्सअप चॅटचा पुरावा म्हणून आधार घेण्यात आलं होते त्यावर आक्षेप घेण्यासारखं काहीही नसल्याचं 28 ऑक्टोबरला दिलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या प्रतीमध्ये म्हटले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here