सोलापूर,दि. 31: रुग्णांना अत्यावश्यक सेवा देणार्या 108 मोफत रुग्ण वाहिका बरोबरच शासकीय, निमशासकीय सदर सेवा ह्या ओला, उबेर च्या धर्तीवर अॅप द्वारे कार्यप्रणाली असावी, यामुळे रुग्ण सेवेला बळकटी येऊन रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्ण वाहिका तात्काळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
कोव्हिड-19 च्या काळात अनेकांना रुग्ण वाहिका उपलब्ध न झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. हे ताजे उदारहरण आहेच.
वेळेवर रुग्ण वाहिका उपलब्ध न झाल्याने मृत्यू झाल्याचे ही या काळात निर्दशनास आलेले आहे. त्या वेळची परिस्थिती रुग्ण वाहिकेतील कार्य प्रणाली बदलायची नव्हती. दरम्यानच्या काळात पाहता 108 रुग्ण वाहिका ह्या शासनाची महत्वकांक्षी योजना तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात सुरू झाली. त्यानंतर युतीच्या सरकारात देखील सुरू राहिली. आता देखील सुरू आहे. मात्र खाजगी कंपनीची माध्यमातून सदरची सेवा पुरविली जात असल्याने ही मोफत सेवा आहे. त्याच पध्दतीने गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. यामध्ये बदल होणे काळाची गरज असताना याकडे शासनाकडून काना-डोळा होत असल्याचे अनेकदा स्पष्ट झालेले आहे.
मुंबई येथील आरोग्य विभागाच्या एका वरीष्ठ अधिकार्यांकडून 108 रुग्ण वाहिका ही मोफत सेवा ओला, उबेर अॅपच्या धर्तीवर कार्यन्वीत करण्याकामी शासनाला सूचना केलेली आहेत. सदरील विषय हा लाल फितीत अडकलेला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यंड्रावकर यांनी कोव्हिड-19 चा काळ चांगल्या पध्दतीने हातळल्याने विरोधी पक्ष व महाराष्ट्रातील जनतेने देखील त्यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी त्या काळात केलेल्या उपायोजना ह्या उल्लेखनिय ठरल्या, केंद्र सरकारच नव्हे तर अन्य राज्यातील सरकारने देखील त्यांचे कौतुक केले.
आज ही ते आरोग्य खाते चांगल्यारित्या सांभाळत आहेत. यांच्याकडून रुग्णांना अत्यावश्यक सेवा देणार्या 108 रुग्ण वाहिका ह्या ओला, उबेर अॅप च्या धर्तीवर कार्यप्रणाली करण्याबाबत त्वरीत पाउले उचलण्याची मागणी पुढे येत आहे.
108 रुग्ण वाहिका ह्या मोफत, चांगल्या सुविधा देत असल्या तरी त्यावर कार्यरत असणारे चालक, डॉक्टर व वैद्यकिय पथक यांच्यावर सतत पडत असलेल्या ताणामुळे काही वेळा रुग्ण सेवेमध्ये कुचराई होते.
कोव्हिड-19 च्या काळात 108 सेवेतील पथकाने जिव धोक्यात घालून रुग्ण सेवा केल्याचे उदाहरण आहेत. मात्र कोव्हिड- 19 च्या आगोदर व नंतर सदरची सेवा देत असताना अनेक वेळा रुग्ण वाहिका येत असल्याचे सांगून रुग्णांच्या नातेवाईकांना ताटकळत बसविण्या बरोबरच अतिदक्षता रुग्णांची होणारी हेळसांड, जीव गमावणे असे प्रकार घडल्याचे उदाहरण आहेत. याचे केवळ कारण रुग्ण वाहिका वेळेवर न पोहचणे, वाहक व त्यांच्या पथकाकडून काना-डोळा करणे अन् विलंब करणे असे अनेक वेळा अडळून आले आहे. सदरची रुग्ण वाहिका बूकींग करण्यासाठी 108 डायल करून कळवावे लागते. हा क्रमांक थेट पुण्याला जातो. तेथून जिल्हा, तालुका, शहर, ग्रामपातळी पर्यंत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, अन्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे उपलब्ध असलेल्या रुग्ण वाहिकेच्या माध्यमातून सदरची सेवा दिली जाते.
मात्र सदरची सेवा ही अति तात्काळ द्यावयाची असताना देखील त्या पध्दतीने दिली जात नाही. असे गेल्या अनेक वर्षापासून वरीष्ठ वैद्यकिय अधिकार्यांच्या निर्दशनास आलेेले आहे. यात बदल होण्याबाबत सूचना देखील करण्यात आल्या. त्यात बदल करत असताना ओला, उबेर अॅपच्या धर्तीवर केल्यास सदरची रुग्ण वाहिका कुठे आहे, किती अंतरावर आहे, चालक, वैद्यकिय पथक यासह किती वेळेत पोहचेल हे सर्व अॅपच्या माध्यमातून रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती होऊन रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहचविण्याची मदत होणार आहे.
याबरोबरच रुग्ण वाहिकेचे महिनाकाठचे मेंन्टेन्स देखील वेळेवर होऊन पुनश्च: रुग्ण सेवेत दाखल होईल. असे अनेक प्रकारचा फायदा या ओला, उबेर अॅपच्या धर्तीवर केल्यास निश्चित फायदा होणार आहे. यामुळे संबंधित पथकाचे रुग्णांच्या नातेवाईकांना स्टेटस कळत असल्याने पथकाकडून खोटे बोलले जाणार नाही. हा देखील मोठा फायदा होणार आहे. यासह 108 वळगता काही शासकीय, निमशासकीय रुग्ण वाहिकांचे भाडे देखील ह्या अॅपच्या माध्यमातून रुग्णांच्या नातेवाईकांना उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तरी या बाबत आरोग्य विभाग त्वरीत निर्णय घेण्याची मागणी पुढे येत आहे.
राज्यात एकूण सुमारे 10 हजार रुग्ण वाहिका आहेत. 108 सह अन्य रुग्ण वाहिकांना देखील अशाच पध्दतीची कार्यप्रणाली असावी. अशी रास्त मागणी होत आहे. आरोग्य विभागाच्या गतीमान, सुलभ प्रशासनासाठी सदरची अंमलबजावणी त्वरीत करावी. अशी मागणी जोर धरत आहे.