नवी दिल्ली,दि.२३: Anil Desai On Kapil Sibal: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेल्या दिवसांपासून सुनावणी सुरू आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी पहिले दोन दिवस ठाकरे गटाची बाजू मांडताना अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. कपिल सिब्बल यांनी भावनिक होत युक्तिवाद केला. युक्तिवादाच्या शेवटी कपिल सिब्बल हे भावनिक झाल्याचंही बघायला मिळालं.
अनिल देसाई म्हणाले… | Anil Desai On Kapil Sibal
कपिल सिब्बल ज्येष्ठ वकील आहेत. अनेक दशकं त्यांनी सर्वोच्च न्यायालयात भारताची सर्वोच्च घटना आणि सर्वोच्च न्यायालय याचं मूल्य कमी होता कामा नये यासाठी काम केलं. असं झालं तर तो लोकशाहीसाठी शेवटचा खिळा ठरेल. त्यामुळे त्यांनी भावनावश होणं साहजिक आहे. ज्यांनी असंख्य लढाया न्यायालयात लढल्या आहेत. संविधानाचं आणि लोकशाहीचं जतन व्हावं यासाठीच हा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया अनिल देसाई (Anil Desai) यांनी दिली.
तोच व्हीप ३ तारखेलाही लागू होताच | Anil Desai
३ तारखेला शिंदे गटाच्या आमदारांनी शिवसेनेच्या व्हीपच्या विरोधात मतदान केलं. राजन साळवी या अधिकृत उमेदवाराला मतदान करणं हे त्यांचं कर्तव्य होतं. ते न करता त्यांनी राहुल नार्वेकरांना मतदान केलं. त्यामुळे व्हीपचं उल्लंघन त्यांनी केलंय. ३ तारखेला व्हीप लागू होता. राहुल नार्वेकरांनी त्यांची निवड झाल्यानंतर रात्री त्यांनी भरत गोगावलेंना प्रतोद म्हणून मान्यता दिली. त्यामुळे शिवसेनेचा व्हीप तेव्हा लागू होता ते न्यायालयानंही मान्य केलं आहे असेही देसाई म्हणाले.