नवी दिल्ली,दि.३०: Shraddha Walker Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावालाने पॉलिग्राफ टेस्टमध्ये खळबळजनक विधान केलं आहे. आफताब पुनावालाच्या पॉलिग्राफ टेस्टमधून सातत्यानं नवनवीन माहिती समोर येत आहे. चौकशीदरम्यान त्यानं एक अतिशय खळबळजनक विधान केलं आहे. आफताबनं नोंदवलेल्या जबाबातून त्याची कट्टर मानसिकता दिसून आली आहे.
जन्नतमध्ये गेल्यावर मला अप्सरा भेटतील
श्रद्धाच्या हत्या प्रकरणात मला फाशी झाली तरीही पश्चाताप वाटणार नाही. कारण जन्नतमध्ये गेल्यावर मला अप्सरा भेटतील, असं आफताबनं म्हटल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं दिली आहे. एकट्या श्रद्धाशीच नव्हे, तर तिच्यासारख्या जवळपास २० हिंदू तरुणींशी संबंध होते, असंही आफताब म्हणाला. दैनिक जागरणनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

निशाण्यावर केवळ हिंदू तरुणी
आफताबच्या चौकशीतून अतिशय धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. आफताबच्या निशाण्यावर केवळ हिंदू तरुणी होत्या. बंबल डेटिंग ॲपच्या माध्यमातून तो केवळ हिंदू मुलींशीच संपर्क साधायचा आणि चॅट करताना त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचा. श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबनं एका सायकॉलॉजिस्ट महिला डॉक्टरला फ्लॅटवर बोलावलं होतं. तीदेखील हिंदूच होती. श्रद्धाची अंगठी त्यानं तिला भेट दिली होती. या डॉक्टरशिवाय आणखी अनेक तरुणीदेखील आफताबच्या संपर्कात होत्या.
कोणताच पश्चाताप नाही
आफताब अतिशय आत्मविश्वासानं उत्तर देतो. पोलिसांच्या प्रश्नाला तो लगेच उत्तर देतो. चौकशीदरम्यान तो अत्यंत रिलॅक्स असतो, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यानं दिली. श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्यानं तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. ते करताना त्याला कोणताच पश्चाताप झाला नाही. पोलीस कोठडीत असताना त्यानं दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या चेहऱ्यावर चिंतेची लकेरदेखील नव्हती.
हत्या करून मृतदेहाचे तुकडे करायचे अगोदरच ठरवले होते
आफताबकडे पाहिल्यावर त्यानं इतकी निर्घृण हत्या केली आहे असं वाटत नाही. इतका तो शांत आणि थंड असतो. चौकशी संपल्यावर तो अतिशय शांतपणे झोपतो. चौकशीदरम्यान त्यानं हत्येच्या योजनेबद्दल सांगितलं. श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करायचे हे मी मुंबईत असतानाच ठरवलं होतं, असं त्यानं पोलीस चौकशीत सांगितलं.
आफताबनं १८ मे रोजी श्रद्धाची दिल्लीतील मेहरोलीत हत्या केली. हत्या केल्यानंतर त्यानं बाजारातून करवत आणि फ्रिज आणला. श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून आफताबनं फ्रिजमध्ये ठेवले. दररोज रात्री २ वाजता तो घराबाहेर पडायचा आणि एक-एक तुकडा जवळच असलेल्या जंगलात फेकून यायचा. बरेच दिवस श्रद्धाची ख्यालीखुशाली न समजल्यानं, तिचा कॉल, मेसेज येत नसल्यानं तिच्या एका मित्राच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यानं श्रद्धाच्या वडिलांशी संपर्क साधला. त्यांनी श्रद्धाच्या अपहरणाची तक्रार नोंदवली. आफताबवर संशय व्यक्त केला आणि हे प्रकरण उघडकीस आलं.