Sharad Pawar: पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले प्रत्युत्तर

0

मुंबई,दि.21: पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांची पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी करण्याची भाजपा आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मागणी केली आहे. कथित पत्राचाळ घोटाळा (Patra Chawl Case) प्रकरणी माजी मुख्यमंत्री व तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्र्यांचा उल्लेख असल्याचे समोर आलं आहे. यामध्ये 2006-2007 या काळात एका तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि एक माजी मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीनंतर गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून राकेश वाधवान यांना पत्राचाळीचा विकास करण्यासाठी आणण्यात आलं होतं. त्यानंतर यामध्ये 1 हजार 34 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं त्या चार्जशिटमध्ये म्हणण्यात आलं आहे.

पत्राचाळ प्रकरणामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासोबत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक घेतल्याचा आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला होता. पण, या आरोपाला आधार काय आहे, तो मला हवा आहे, अशी प्रतिक्रिया देऊन शरद पवार यांनी पलटवार केला आहे.

पत्राचाळ प्रकरणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शरद पवार यांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे.

‘पत्राचाळ प्रकरणामध्ये माझ्यावर आरोप केले आहे. कृषिमंत्री असताना संजय राऊत यांच्यासोबत बैठक घेतली होती, त्याबद्दल आधार काय आहे. तो मला हवा आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

‘शरद पवार यांनी 14 ऑक्टोबर 2006 रोजी ही बैठक घेतली होती. त्याच्यामध्ये हाउसिंग संदर्भात सर्वजण उपस्थितीत होते. हा 1998 चा प्रकल्प आहे. तेव्हापासून टेनर हे दारोदारी फिरत आहे. शरद पवार यांना बैठक नवी नाही. शरद पवार हे मंत्री असताना त्यांनी अनेक बैठका घेतल्या आहेत. राज्यातील अनेक प्रकल्पासाठी शरद पवार हे बैठकीला हजर राहिले आहे. दिशा देण्याचे काम शरद पवार यांनी केले, त्यांनी कोणतेही निर्णय घेतले नाही, असा जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

तत्कालीन मुख्यमंत्री सुद्धा त्यावेळी बैठकीला होते. त्या बैठकीमध्ये सर्वांनी चर्चा केली होती. त्याबद्दल कोणताही निर्णय घेतला नव्हता, असं बैठकीच्या लेखी आढाव्यात स्पष्ट आहे. त्यामुळे पराचा कावळा करू नये, असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लगावला.

या प्रकरणाची चौकशी करायची असेल तर करावी, पण शरद पवार यांना बदनाम करण्याचा डाव आखला गेला आहे. राजकीय दृष्ट्या कुणालाही बदनाम करण्याचा डाव आखला गेला आहे, अशी टीकाही पवारांनी केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here