मुंबई,दि.24: Maharashtra Crisis : पक्षादेश न मानल्याने एकनाथ शिंदे गटातील आमदार अपात्र होणार का? राज्यात सुरु असलेला अभूतपूर्व राजकीय संघर्ष आता कायदेशीर मार्गाने जाण्याची दाट शक्यता आहे. संख्याबळाचा विचार करता एकनाथ शिंदे गटाकडे सर्वाधिक आमदार असल्याचे दिसून येत आहे.
पक्षादेश न मानल्याने शरद यादव ठरले होते अपात्र
मात्र, पक्षादेश न मानल्याने शरद यादव यांना राज्यसभेतून 2017 अपात्र ठरवण्यात आले होते. जनता दल युनायटेडने (JDU) पक्षाच्या निर्देशाचे उल्लंघन करून पाटणा येथे विरोधी पक्षांच्या रॅलीत हजेरी लावल्याच्या कारणावरून त्यांची राज्यसभेतून अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्यानंतर जेडीयूचे बंडखोर खासदार शरद यादव आणि अली अन्वर यांना राज्यसभेतून अपात्र ठरवण्यात आले.
दोन वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या निर्देशांचे उल्लंघन करून आणि विरोधी पक्षांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांचे सदस्यत्व “स्वेच्छेने सोडले” होते, या JDU च्या युक्तिवादाला राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी सहमती देत राज्यसभेतून अपात्र ठरवले होते.
जेडी(यू) ने त्यांच्या निर्देशाचे उल्लंघन करून पाटणा येथे विरोधी पक्षांच्या रॅलीत हजेरी लावल्याच्या कारणावरून त्यांची अपात्रता मागितली होती. जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमधील महाआघाडीला धुडकावून लावल्यानंतर आणि भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर यादव यांनी विरोधकांशी हातमिळवणी केली होती.
शरद यादव यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या आमदारांवर अशी कारवाई होऊ शकते का? हे लवकरच कळेल. अशा प्रकारे कारवाई झाल्यास महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता नाही.