Uddhav Thackeray Aurangabad Speech: तुमच्याकडे काही दिलं तर झाकायचं आणि आमचं बोंबलत सुटायचं: उध्दव ठाकरे

0

औरंगाबाद,दि.८: Uddhav Thackeray Aurangabad Speech: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पूर्ण ताकदीने पहिल्यांदाच मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर आज सायंकाळी सभा होत आहे. मराठवाड्यातील शिवसेनेच्या पहिल्या शाखा स्थापनेला ८ जून रोजी ३७ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने होणाऱ्या हिंदुत्वाचा हुंकार या घोषवाक्यासह सभेचा प्रचार करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेनेने औरंगाबादमध्ये गावागावात बैठका घेत ताकद लावलीय. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे यांची सभा होत असल्याने शिवसेनेने ताकद लावली आहे. या सभेत शिवसेना शक्तिप्रदर्शन करून राज ठाकरेंसह विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून शिवसैनिक औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत.

आत्ताही शहराच नाव बदलू शकतो

मी आत्ताही शहराचं नाव बदलू शकतो, मात्र, नाव बदललं आणि पाणी प्रश्न तसाच राहिला, इतर प्रश्न तसेच राहिले तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उध्दव ठाकरे म्हणाले, “संभाजीनगर कधी करणार हे विचारतात. ते माझ्या वडिलांनी दिलेलं वचन आहे, ते केल्याशिवाय मी राहणार नाही. मंत्रिमंडळात मान्यता दिली आहे. सुरूवात म्हणून विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करा असा ठराव केंद्राकडे दिलाय. का होत नाहीये. तुमच्याकडे काही दिलं तर झाकायचं आणि आमचं बोंबलत सुटायचं. जेव्हा मी नामातर करेन तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना आदर्श वाटेल अभिमान वाटेल असं करेन.”

वेळेत पाणी योजना पूर्ण झाली नाही, तर ठेकेदारांना तुरुंगात टाकणार

मी पहिल्यांदा औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर बोलणार आहे. मी पाणी प्रश्न असताना त्याकडे तोंड फिरवणार नाही. मी असा मूर्ख राजकारणी आहे जो या पाणी प्रश्नाला भिडतो आहे. कारण माझ्याकडे प्रामाणिकपणा आहे. किती वर्ष ऐकत बसणार? आता निधी मंजूर केलाय, वेळेत पाणी योजना पूर्ण झाली नाही, तर ठेकेदारांना दयामाया न करता तुरुंगात टाकणार आहे : उद्धव ठाकरे

ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते

उध्दव ठाकरे म्हणाले, “ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते. त्यामुळे मला या सैनिकांची शक्तीही तिकडे वाया घालवायची नाही.”

भाजपावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मध्ये जो होता तो आक्रोश मोर्चा जनतेसाठी नव्हता. सत्ता गेल्यामुळे आक्रोश होता. पाण्यासाठी आक्रोश असता पाच वर्ष तुम्ही बसला होता, आम्ही सोबत होतो. निवडणूक आलं की काहीतरी तोंडावर फेकायचं आणि जिंकल्यावर तंगवत ठेवायचं, हे खोटं बोलण्याचं हिंदुत्व आमचं नाही.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here