नवी दिल्ली,दि.31: जम्मू-काश्मीरला दहशतवादापासून मुक्त करण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर (मसरत आलम ग्रुप) नंतर आता सरकारने तहरीक-ए-हुर्रियतवर बंदी घातली आहे. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) म्हणाले की, दहशतवादी कारवायांमुळे या संघटनेवर UAPA अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर सांगितले की, ‘तेहरिक-ए-हुर्रियत, जम्मू-काश्मीरला UAPA अंतर्गत ‘बेकायदेशीर संघटना’ घोषित करण्यात आले आहे.
गृहमंत्र्यांनी लिहिले, “ही संघटना जम्मू आणि काश्मीर भारतापासून वेगळे करण्यासाठी आणि इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्यासाठी प्रतिबंधित कारवायांमध्ये गुंतलेली आहे. हा गट जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादाला चालना देण्यासाठी भारतविरोधी प्रचार करत आहे आणि दहशतवादी कारवाया सुरू ठेवत आहे.” दहशतवादाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शून्य सहिष्णुता धोरणानुसार भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतलेली कोणतीही व्यक्ती किंवा संघटना तात्काळ हाणून पाडली जाईल.
भारत सरकारने बंदी का घातली?
भारत सरकारने तेहरीक-ए-हुर्रियत संघटना जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादी विचारसरणीचा प्रसार करत असल्याची माहिती देणारी अधिसूचना जारी केली. हे लोक दहशतवाद्यांना श्रद्धांजली वाहतात आणि दगडफेकीला प्रोत्साहन देतात. संघटनेचे लोक भारतीय कायद्याचे पालन करत नाहीत आणि काश्मीरला भारतापासून वेगळे मानतात. चार दिवसांत सरकारने दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या आणखी एका मोठ्या संघटनेवर कारवाई केली आहे.
मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर (मसरत आलम गट) वरही बंदी
यापूर्वी 27 डिसेंबर रोजी गृह मंत्रालयाने मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर (मसरत आलम ग्रुप) वर बंदी घातली होती. देशविरोधी कारवायांमुळे या संघटनेवर UAPA अंतर्गत 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे, असे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले होते.
ही संघटना आणि तिचे सदस्य जम्मू-काश्मीरमध्ये देशविरोधी आणि फुटीरतावादी कारवायांमध्ये गुंतले आहेत आणि दहशतवादी कारवायांचे समर्थन करतात, असे त्यांनी सांगितले होते. जम्मू-काश्मीरमध्ये इस्लामिक राज्य स्थापन करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करतात.