मुंबई,दि.8: सोलापूरसह महाराष्ट्रात तापमानात वाढ झाली आहे. महाराष्ट्रासह उत्तर हिंदुस्थानात उष्णतेची प्रचंड लाट आली आहे. हवामान खात्याने रविवारी उत्तरेकडील राज्यांना तापमानवाढीचा अलर्ट दिला होता. तसेच काही राज्यात तापमान 40 अंशांवर जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. सोलापूर येथे सोमवारी 42 अंश सेल्सिअस तापमान होते.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे उत्तर हिंदुस्थान तापमानवाढीने होरपळला आहे. उत्तर हिंदुस्थानातील 21 शहरांमध्ये तापमान 41 अंशांच्यावर पोहचले आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात तापमानवाढ झाल्याचे दिसून आले.
उत्तरेकडील पाच राज्यांमधील 21 शहरांमध्ये रविवारी तापमान 42 अंश सेल्सिअस आणि त्याहून अधिक तापमान नोंदवले गेले. राष्ट्रीय राजधानी दिल्लीला पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. दिल्लीव्यतिरिक्त राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि ओडिशातही उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.