Sudhanshu Trivedi: भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान

Sudhanshu Trivedi: छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचवेळा औरंगजेबला पत्र लिहिलं होतं असं वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी केलं आहे

0

मुंबई,दि.२०: भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. महाराष्ट्रात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकर यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं. आजतक या वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागतली होती, ते ब्रिटीशांकडून पेन्शन घेत होते, अशा आशयाचं विधान राहुल गांधींनी केलं. त्यांच्या विधानानंतर महाराष्ट्रसह देशभरातील राजकीय नेत्यांकडून निषेध केला.

हे प्रकरण ताजं असताना आता भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्तविधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचवेळा औरंगजेबला पत्र लिहिलं होतं. त्या काळात राजकीय अडचणीतून बाहेर येण्यासाठी अनेक लोकं माफीनामा लिहायचे असं विधान त्रिवेदी यांनी केलं आहे. त्यांनी केलेल्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.

हेही वाचा राहूल गांधी यांनी घेतला सोलापूरी जेवणाचा आस्वाद, स्वत: तळली सोलापूरी आंध्रा भजी

जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला व्हिडिओ

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा हा व्हिडीओ शेअर करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची पत्र लिहून माफी मागितली होती, असं बोलणारा भाजपा प्रवक्ता वेडाच असू शकतो.”

काय म्हणाले सुधांशु त्रिवेदी?

राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत ‘आज तक’ने चर्चासत्र भरवलं होतं. या चर्चासत्रात भाजपाची भूमिका मांडण्यासाठी प्रवक्ता म्हणून सुधांशु त्रिवेदी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी आपली बाजू मांडताना सुधांशु त्रिवेदी म्हणाले, “सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती, असं सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला. त्या काळात अनेक लोकं प्रस्तावित फॉरमॅटमधून (Prescribed Format) बाहेर निघण्यासाठी माफी मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील पाचवेळा औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. मग याचा अर्थ काय झाला? पण सावकरांनी ब्रिटीश संविधानाची शपथ तरी घेतली नव्हती” असं वक्तव्य त्रिवेदी यांनी केलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here