स्थायी समिती सभापती पदासाठी ‘या’ उमेदवाराला सोलापूरकरांची पहिली पसंती!

0
बिज्जू प्रधाने आणि अविनाश पाटील

सोलापूर,दि.३: सोलापूर महानगरपालिकेच्या सत्तेचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. ६ मार्च रोजी होणाऱ्या या निवडीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, हे पद कोणाकडे जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, ‘सोलापूर वार्ता’ने घेतलेल्या जनमत चाचणीत (Poll) नागरिकांनी आपली पसंती स्पष्टपणे व्यक्त केली आहे.

जनतेचा कौल: बिज्जू प्रधाने आघाडीवर

सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी कोणाला संधी मिळावी, याबाबत नागरिकांची मते जाणून घेतली असता, खालील आकडेवारी समोर आली आहे:

बिज्जू प्रधाने: ५५% नागरिकांनी प्रधाने यांना सभापती पदासाठी पहिली पसंती दिली आहे.

अविनाश पाटील: २९% मतदारांनी पाटील यांच्या नावाला पाठिंबा दर्शवला आहे.

रंजिता चाकोते: ९% नागरिकांना वाटते की महिला नगरसेविका म्हणून चाकोते यांना संधी मिळावी.

गणेश वानकर: ६% लोकांनी वानकर यांच्या बाजूने कौल दिला आहे.

निवडणुकीचे चित्र आणि चुरस

नवनिर्वाचित सदस्यांची पहिली सर्वसाधारण सभा २० फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडल्यानंतर आता सर्वांचे डोळे ६ मार्चकडे लागले आहेत. जरी या पदासाठी चुरस असली, तरी ही निवड बिनविरोध होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

बिज्जू प्रधाने, अविनाश पाटील, गणेश वानकर आणि रंजिता चाकोते या दिग्गज नावांच्या चर्चेने सोलापूरचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रशासकीय कामाचा अनुभव आणि जनतेतील संपर्क या जोरावर ५५% लोकांनी बिज्जू प्रधाने यांच्या पारड्यात आपले मत टाकले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here