नाशिक,दि.7: Sanjay Raut On Shinde-Fadnavis Government: शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारबाबत मोठा दावा केला आहे. चित्र हळू हळू बदलतेय. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण परिवर्तनाच्या दिशेने जात आहे. 2024 ची तयारी सुरू आहे. पण त्याआधीही परिवर्तन होऊ शकेल. जर आमच्या न्यायव्यवस्थेवर दबाव आला नाही तर हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही हे माझे मत पक्के आहे. न्यायव्यवस्थेवर दबाव येईल असे वाटत नाही. संविधान, घटना आणि कायदा याचे उल्लंघन करणारे सरकार फेब्रुवारीचा महिना पाहणार नाही असा दावा राऊतांनी केला आहे. (Sanjay Raut News)
16 आमदार अपात्र ठरतील | Sanjay Raut News Today
राऊत म्हणाले की, 16 आमदार अपात्र ठरतील. केवळ वेळकाढूपणाचं धोरण स्वीकारलं आहे. सरकार व्हेटिंलेटरवर असून ते सर्वोच्च न्यायालयाने काढलं तर हे राम होईल. कुणी त्यांच्यासोबत राहणार नाही. आता हे सरकार कधी उलथवायचं आणि निवडणुकांना सामोरे जायचं याची प्रतिक्षा राज्यातील जनता करतेय. अधिवेशन काळात सरकारचा जो गोंधळ होता तो जवळून पाहता आला. रोज एका मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर येऊनही सरकार गेंड्याच्या कातडीप्रमाणे बसून होतं. या राज्यात सरकार अस्तित्वात नाही असं त्यांनी सांगितले.
सरकार पाण्यात बसलेल्या म्हैशीसारखे… | Sanjay Raut On Shinde-Fadnavis Government
त्याचसोबत अनेक प्रकरण अधिवेशन काळात समोर येऊनही सरकार पाण्यात बसलेल्या म्हैशीसारखे जणू काही घडलेच नाही आणि विरोधी पक्षच जबाबदार आहे अशा पद्धतीने काम करते. पूर्वी हायकोर्टाने ताशेरे मारले तरी मंत्री राजीनामा द्यायचे. पण एका अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह 6 मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची पुराव्यासह प्रकरण समोर आली तरी सरकार ठोंब्याप्रमाणे बसून आहे. 40 आमदारांसाठी हे सरकार आहे असा टोला राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) लगावला.
शिवसेना एकच आहे | Sanjay Raut News
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना. शिवसेना एकच आहे. गट-तट हे तात्पुरते आहे. शिवसेना एकच आहे. या शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली. त्या शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतायेत. आमच्यासह संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे. शिवसेना हा महावृक्ष आहे. त्याचे बीज बाळासाहेबांनी रोवले. महावृक्ष फोफावतो, वाढतो. पाचोळा पडतो. कचरा पडतो तो कचरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वेचून नेला जातोय. त्यांच्यासमोर मुख्यमंत्री भाषण करतात. कचरा आग लावण्यासाठी असतो. या कचऱ्याचा धूर फार काळ राहत नाही असंही राऊतांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत म्हटलं आहे.