Russia-Ukraine War: युक्रेन संकटावर भारताच्या भूमिकेवर रशियाने काय म्हटले?

0

दि.2: Ruusia-Ukraine War: युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याबाबत (Russia-Ukraine War) भारताने (India) आतापर्यंत संयुक्त राष्ट्रात आपली भूमिका तटस्त ठेवली आहे. रशिया (Russia) भारताच्या संतुलित भूमिकेचे कौतुक करत आहे. रशियाने पुन्हा एकदा भारताचे कौतुक केले असून भारताच्या संतुलित भूमिकेबद्दल आम्ही आभारी आहोत असे म्हटले आहे.

पाश्चात्य देशांचा दबाव वाढत असतानाही भारताने संयुक्त राष्ट्रात रशियाच्या हल्ल्याचा उल्लेख केलेला नाही. युक्रेनमधील रशियाच्या हल्ल्याचा निषेध करणाऱ्या सर्व ठरावांवर मतदानादरम्यान भारतही अनुपस्थित राहिला. आता रशियाने पुन्हा एकदा रशिया-युक्रेन युद्धाबाबत (Russia-Ukraine War) भारताच्या न्याय्य भूमिकेचे कौतुक केले आहे. रशिया भारताप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, असे भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलापोव यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी रशिया भारतीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

रशियन राजदूत म्हणाले, “खार्किव आणि पूर्व युक्रेनच्या इतर भागात अडकलेल्या भारतीयांबाबत आम्ही भारतीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत.” आम्हाला रशियन अधिकारक्षेत्रात अडकलेल्या सर्व लोकांना आपत्कालीन परिस्थितीत बाहेर काढण्यासाठी भारताकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत.

भारताने आतापर्यंत UN मध्ये घेतलेल्या भूमिकेचे कौतुक करताना रशियन राजदूत म्हणाले, “संतुलित दृष्टिकोन स्वीकारल्याबद्दल आम्ही भारताचे आभारी आहोत.” भारताला अलीकडील संकटाची खोली समजली आहे आणि संपूर्ण परिस्थितीची गुंतागुंत माहीत आहे. भारताने संयुक्त राष्ट्रात पक्षविरहित भूमिका स्वीकारली आहे. आम्हाला आशा आहे की भारत आपले स्थान कायम राखेल.

रशियन राजदूत म्हणाले की, युक्रेनमध्ये काय चालले आहे, याची माहिती आम्ही भारताला देत आहोत. त्याचवेळी, अलीकडच्या संकटाचा भारतासोबतच्या S-400 क्षेपणास्त्र प्रणालीच्या वितरणावर कोणताही परिणाम होणार नाही, याची पूर्ण खात्री त्यांनी दिली.

भारताची संयुक्त राष्ट्रांमध्ये आतापर्यंतची भूमिका

भारताने आतापर्यंत ना रशियाचा निषेध केला आहे ना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आपली बाजू मांडली आहे. तणाव कमी करण्याची नितांत गरज असून संवादातूनच समस्या सोडवता येऊ शकतात, असे भारत सातत्याने सांगत आला आहे.

युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाचा निषेध करणाऱ्या आणि युद्ध ताबडतोब संपवण्याच्या ठरावावरही सुरक्षा परिषदेत मतदान घेण्यात आले, मात्र भारताने त्या मतदानात भाग घेतला नाही. ठराव पास होण्यापासून रोखण्यासाठी रशियाने आपला वीटो पॉवर वापरला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here