दि.24: Russia Ukraine War: रशियाच्या (Russia) हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनने (Ukraine) भारताकडे मदत मागितली आहे. युक्रेनच्या राजदूताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. युक्रेनचे राजदूत इगोर पोलिखा (Igor Polikha) म्हणाले की, भारत आणि रशियाचे संबंध चांगले आहेत. भारत युक्रेन-रशिया वादावर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाचे योगदान देऊ शकते. इगोर पोलिखा म्हणाले की, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो की त्यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि आमचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी त्वरित संपर्क साधावा.
या हल्ल्यावर रशियाकडून येत असलेल्या वक्तव्याचाही त्यांनी निषेध केला. पोलिखा म्हणाले की, रशिया केवळ लष्करी तळांवर हल्ले होत असल्याचा दावा करत आहे, परंतु या हल्ल्यात नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. त्या बदल्यात युक्रेनने पाचहून अधिक रशियन विमाने पाडली आहेत, त्याशिवाय टँक आणि ट्रक्सचाही ढीग पडला आहे, असेही सांगण्यात आले.
युक्रेन-रशिया वादावर भारताच्या भूमिकेबद्दल बोलायचे तर भारत आतापर्यंत तटस्थ राहिले आहे. म्हणजे युद्धात किंवा विरोधात भारत अद्याप कोणाच्याही बाजूने नाही. गुरुवारी सकाळी परराष्ट्र मंत्रालयाकडून असेही सांगण्यात आले की या युद्धाबाबत भारताची भूमिका तटस्थ आहे आणि त्यांना शांततापूर्ण तोडगा निघण्याची आशा आहे. यापूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या आपत्कालीन बैठकीत भारताने युक्रेनमध्ये शिकणाऱ्या किंवा नोकरीसाठी जाणाऱ्या 20 हजार भारतीयांच्या सुरक्षेची काळजी असल्याचे सांगितले होते.
युक्रेन हा भारतासारखा लोकशाही देश असल्याचे राजदूत म्हणाले. भारत हा UN सुरक्षा परिषदेचा कायमस्वरूपी सदस्य आणि प्रभावी जागतिक देश आहे.
भारताने केली ॲडव्हायजरी जारी
युक्रेनमधील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने तेथे उपस्थित लोकांसाठी एक नवीन ॲडव्हायजरी जारी केली आहे. सध्या परिस्थिती वाईट आहे, तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा, असे सांगण्यात आले आहे. लोकांना त्यांच्या घरी, वसतिगृहात राहण्यास सांगितले आहे. जे लोक युक्रेनची राजधानी कीव किंवा वेस्टर्न कीव्हच्या दिशेने गेले आहेत, त्यांनी आपल्या घरी परतावे, असेही म्हटले आहे.