दि.14: सध्या कतरिना कैफ तिच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्यासाठी इंटरनेटवर चर्चेत आहे. काही लोक हे गाणे रवीना टंडनच्या मूळ गाण्यापेक्षा चांगले म्हणत आहेत, तर मूळ गाण्याशी छेडछाड का केली जात आहे, असा संताप काही लोक यावेळी व्यक्त करत आहेत. आता या गाण्यावर रवीना टंडनचीही प्रतिक्रिया आली असून याचा खुलासा खुद्द कोरिओग्राफर फराह खानने केला आहे. ‘टिप टिप बरसा पानी’ हे 1994 मध्ये आलेल्या ‘मोहरा’ चित्रपटातील गाणे आहे आणि ते रवीना टंडनवर चित्रित करण्यात आले आहे.
फराह खानने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “रवीना टंडन ही पहिली व्यक्ती होती जिने कतरिना कैफ असलेल्या ‘टिप टिप बरसा पानी’च्या रिमिक्सवर आपले मत दिले. तिने मला कॉल करून सांगितले की हे गाणे खूप चांगले आहे आणि कतरिना कैफ खूप चांगली दिसत आहे.” फराह खान पुढे म्हणाली की, कतरिना कैफसारखे हे गाणे कोणी करू शकेल असे तिला वाटत नाही. कतरिना आणि फराहच्या जोडीने असा धुमाकूळ घातल्याची ही पहिलीच वेळ नाही.
याआधी कतरिना कैफ आणि फराह खान या जोडीने शीला की जवानी या गाण्याने खूप चर्चेत आणले होते. कतरिनाबाबत फराह म्हणाली की, तिच्यासोबत काम करणे खूप छान आहे. या गाण्यात कतरिना कैफ छान दिसत आहे आणि यामुळे हे गाणे परिपूर्ण आहे. अक्षय कुमार ‘टिप टिप बरसा पानी’मध्येही दिसला होता. विशेष म्हणजे त्याचं मूळ गाणंही होतं. रवीना टंडन आणि अक्षयच्या जोडीने या गाण्यात चांगलीच धुमाकूळ घातला होता.