मनसे अध्यक्ष राज ठाकरे टोलनाक्यांच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक

0

मुंबई,दि.13: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) टोलनाक्यांच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. “टोलनाक्यांवर पारदर्शकता (Mumbai Toll Naka) यावी यासाठी सरकारचे कॅमेरे लावले जातीलच, पण मनसेही कॅमेरे लावून वॉच ठेवेल. इतकंच नाही तर टोलनाक्यांवर 4 मिनिटांपेक्षा जास्त एकही गाडी थांबणार नाही”, असा निर्णय झाल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. राज ठाकरे यांच्या घरी आज मुंबई आणि महाराष्ट्रातील टोलच्या (Maharashtra Toll) मुद्द्यावर बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गुरुवारी 12 ऑक्टोबरला झालेल्या बैठकीनंतर, आज राज ठाकरेंच्या शिवतीर्थ बंगल्यावर (Shivteerth) बैठकीचं नियोजन होतं. त्याप्रमाणे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यासह प्रशासकीय अधिकारी सकाळी सकाळी 8 वाजता राज ठाकरेंच्या घरी दाखल झाले. यानंतर राज ठाकरेंसोबत टोलबाबत चर्चा झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देण्यात आली.

काय म्हणाले राज ठाकरे?

काल सह्याद्रीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठक झाली. त्यात काही गोष्टी ठरल्या. लेखी स्वरूपात काही गोष्टी काल आल्या नाहीत. नंतर मग आजही बैठक झाली ज्यामध्ये लेखी स्वरूपात काही गोष्टी आल्या आहेत.

9 वर्षानंतर मी सह्याद्री वर गेलो. त्याचवेळी कळलं होतं की टोल संदर्भातील अॅग्रीमेंट 2026 पर्यंत संपणार होते हे मला माहित आहे.

2026 पर्यत अॅग्रीमेंट बँकेसोबत झाल्याने त्यात आता काही करता येत नाही. ठाण्यातील 5 एन्ट्री पॉईंट्सवर टोल वाढविण्यात आले. त्याबाबत मनसेच्या अविनाश जाधव यांनी आंदोलन केले. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वक्तव्य केले की चारचाकी आणि तीन चाकी वाहनांना टोल नाही असे ते म्हणाले. लोकांना वाटलं की आम्हला फसवलं जातंय की काय?

मनसेच्या कॅमेऱ्यांचा टोलवर वॉच

टोल घेणार असाल तर तुम्ही कोणत्या सोयीसुविधा दिल्या गेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. पुढचे 15 दिवस या सर्व एन्ट्री पॉईंट्सवर सरकार आणि आमच्या पक्षाचे कॅमेरे लावले जातील. आणि किती गाड्या या टोलवरून जातात हे कळेल. ही व्हिडिओग्राफी उद्या पासून सुरू होईल. अॅम्ब्युलन्स,स्वच्छतागृह, सीसीटीव्हीचे कंट्रोल मंत्रालयात असेल तिथे लोकांना काय त्रास होतोय लोकांना ते कळेल.

करारमधील नमूद उड्डाणपूल यांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल. आयआयटी मुंबईकडून हे ऑडिट करण्यात येईल. 5 रुपये वाढीव टोलबाबत 1 महिन्याचा अवधी सरकारला हवा आहे. त्यानंतर वाढीव टोल रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल.

यलो लाईनच्या पुढे वाहनांच्या रांगा गेल्या तर वाहनांचा टोल न घेता टोलवरून वाहने सोडली जातील. किती टोल आहे, किती भरले गेले, जमा किती झाले हे सगळं लोकांसमोर येईल यासाठी दोन्ही बाजूने बोर्ड लावले जातील.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here