प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची नारायण राणे यांची मागणी

0

पुणे,दि.30: प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची नारायण राणे (Narayan Rane) यांनी मागणी केली आहे. राज्यात दंगली होऊ शकतात असं म्हणणारे वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, अशी मागणी केंद्रीय लघू सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणतात दंगली होऊ शकतात. खरंच राज्यात अशी परिस्थिती आहे का? असा प्रश्न नारायण राणे यांना विचारण्यात आला. त्यावर राणे म्हणाले, “त्यांच्यावर FIR दाखल करून त्यांना अटक व्हायला पाहिजे. त्यांना अटक करायला पाहिजे आणि माहिती घ्यायला पाहिजे. दंगलीचा आधार सांगा”.

नारायण राणे यांना पुन्हा त्याबाबतच विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी सावरासावरव केली. आंबेडकर असो किंवा इतर कोणीही, दंगलीविषयी बोलत असेल तर, पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती घ्यायला हवी. त्यांची चौकशी करायला हवी. दंगली रोखण्यासाठी कारवाई करायला हवी, असं नारायण राणे म्हणाले.

त्यांची चौकशी करायला हवी

प्रकाश आंबेडकर असो किंवा इतर कुणीही असो, जे कोणी दंगलीविषयी बोलत असतील, त्याची पोलिसांनी दखल घ्यावी, त्यांची चौकशी करायला हवी. दंगलीची त्यांच्याकडे काय माहिती आहे ती घेऊन दंगल रोखण्यासाठी कारवाई करावी.दंगल रोखण्यासाठी अटक देखील करायला हवी. प्रकाश आंबेडकर यांच्यावर एफआयआर दाखल करून, त्यांना अटक व्हायला पाहिजे. त्यांना अटक करून दंगलीचा आधार काय आहे याची माहिती घ्यायला पाहिजे, असं नारायण राणे म्हणाले.

आम्ही इथे जनतेच्या उपक्रमासाठी जमलेलो आहेत. मी छगन भुजबळांबाबत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नावर उत्तर द्यायला कटिबद्ध नाही, असं नारायण राणे म्हणाले.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा अभ्यास करावा. ते अजून वयाने लहान आहेत. मराठा समाज ओबीसीतून आरक्षण घेणार नाही, असा दावा नारायण राणे म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here