Chandrashekhar Bawankule: शरद पवारांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

0

मुंबई,दि.23: Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीवरून राज्यातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. 23 नोव्हेंबर 2019 ला कुणाला काहीही कल्पना नसताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांचा शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एका रात्रीत ही घडामोड घडली होती त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं. पहाटेच्या शपथविधीवरून देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला होता. ‘2019 मध्ये आम्ही घेतलेल्या शपथविधी संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना माहिती होती, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळाच खळबळ उडाली आहे. 

पहाटेच्या शपथविधीबदल फडणवीस यांनी केलेल्या दाव्यानंतर शरद पवार यांना विचारले असता, पवार यांनी पहाटेच्या शपथविधीमुळे राज्यातील राष्ट्रपती राजवट हटली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनता आलं, अशा आशयाचं विधान शरद पवारांनी केलं.

शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांची भीती | Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar

शरद पवारांच्या या विधानानंतर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं. शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांची भीती वाटत होती. फडणवीसांनी 2014-19 या काळात ज्यापद्धतीने काम केलं आहे, अशा स्थितीत फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले, तर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पुढील 15 वर्षे सत्तेत येता येणार नाही, अशी भीती शरद पवारांना वाटत होती, असं विधान बावनकुळेंनी केलं.

शरद पवारांनी मान्य केलं की… | Chandrashekhar Bawankule

शरद पवारांच्या विधानाबाबत विचारलं असता बावनकुळे म्हणाले, “शरद पवारांनी मान्य केलं की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री न होऊ देण्यासाठी त्यांनी सारं षडयंत्र रचलं होतं. माझं व्यक्तिगत मत आहे की, फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होऊ नये, म्हणून त्यांनी साऱ्या युक्त्या केल्या. खरं तर, शरद पवारांना भीती वाटत होती की, देवेंद्र फडणवीसांनी ज्यापद्धतीने 2014 ते 2019 काम केलं. त्यानंतर राज्याने आम्हाला बहुमत दिलं. अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले, तर पुढील 15 वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत येण्याची कुठलीच संधी राहणार नाही.”

बावनकुळे पुढे म्हणाले, “महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत जेवढे षडयंत्र झाले आहेत. जेवढे राजकीय पक्ष तोडले गेले, हे पक्ष कुणी तोडले? आम्ही तर बहुमताने निवडून आलो. आमची युती तोडण्याचं कामही शरद पवारांनी केलं. त्यांच्या पार्टीला कधी 100 च्या वर जागा जिंकता आल्या नाहीत. त्यांची पार्टी नेहमची 75 च्या खाली राहिली. त्यामुळे सरकार बनवण्यासाठी त्यांनी नेहमीच पक्षांची तोडफोड केली. शिवसेनेला आज त्यांनी उद्धवस्त करून टाकलं आहे.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here