भारताला घाबरलेल्या पाकिस्तानला करावा लागला लाजिरवाण्या भूमिकेचा सामना

0

सोलापूर,दि.६: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) बंद दाराआड बैठक घेतली. पाकिस्तानच्या विनंतीनंतर झालेल्या या बैठकीचा कोणताही ठोस निकाल लागला नाही. (Pakistan Is Afraid Of India)

घाबरलेल्या पाकिस्तानला करावा लागला…

सोमवारी दुपारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दीड तासांच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीनंतर पाकिस्तानला लाजिरवाण्या भूमिकेचा सामना करावा लागला. या बैठकीनंतर, संयुक्त राष्ट्रांनी कोणतेही अधिकृत निवेदन जारी केले नाही किंवा कोणताही ठराव मंजूर झाला नाही. 

बैठकीदरम्यान, संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत असीम इफ्तिखार यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. त्यांनी सांगितले की, या बैठकीत पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न सोडवण्यावरही चर्चा केली.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर ही बैठक झाली, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती अलिकडच्या काळात सर्वात वाईट पातळीवर पोहोचली आहे. 

असीम इफ्तिखार यांनी काय म्हटले?

या बैठकीत पाकिस्तानने सतत खोटी विधाने केली. ते म्हणाले की, भारताने सिंधू नदी करार स्थगित करण्याच्या हालचाली बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. यामुळे या प्रदेशातील शांतता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. 

यावेळी त्यांनी काश्मीरला आंतरराष्ट्रीय वाद म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला. प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षेसाठी यामुळे गंभीर धोका निर्माण होत असल्याचा दावा. अटारी सीमा बंद करणे, राजनैतिक संबंध आणखी कमी करणे आणि दहशतवादाविरुद्ध भारताची कठोर आणि निर्णायक भूमिका यासारख्या भारताच्या कृतींमुळे या प्रदेशात अस्थिरता वाढत आहे, असे खोटेपणाने पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला पटवून देण्याचा प्रयत्न केला.

या बैठकीनंतर असीम इफ्तिखार यांनी दावा केला की त्यांच्या मागणीनुसार UNSC ची बैठक आयोजित करणे हा त्यांचा राजनैतिक विजय आहे.

पाकिस्तान हा संयुक्त राष्ट्रांचा अस्थायी सदस्य आहे आणि त्याने सध्याच्या परिस्थितीबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला या विषयावर चर्चा करण्याची विनंती केली होती. १५ सदस्यीय UNSC चे अध्यक्षपद मे महिन्यासाठी ग्रीसकडे आहे आणि ५ मे रोजी पाकिस्तानसोबत बैठकीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here