Pak On Operation Sindoor | युद्धापूर्वीच पाकिस्तानने केली मोठी घोषणा 

0
Pak On Operation Sindoor

सोलापूर,दि.७: Pak On Operation Sindoor | युद्धापूर्वीच पाकिस्तानने मोठी घोषणा केली आहे. दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई करत भारताने मंगळवारी रात्री १.३० वाजता ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. हे तिन्ही सैन्यांचे संयुक्त ऑपरेशन होते. भारताच्या बलाढ्य सैन्याने पाकिस्तानमधील ४ आणि पीओकेमधील ५ ठिकाणांना लक्ष्य केले आहे.

Pak On Operation Sindoor | युद्धापूर्वीच पाकिस्तानने केली मोठी घोषणा 

भारताने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्करी कारवाईत, जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयासह नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. भारतीय लष्कराच्या या हल्ल्यात ९० दहशतवादी मारले गेले आहेत. अणुहल्ला आणि जोरदार प्रत्युत्तराची धमकी देणारा पाकिस्तान आता मागे पडला आहे.

Pak On Operation Sindoor
Pak On Operation Sindoor

भारताने केलेल्या या हल्ल्याकडे दोन्ही देशांमधील युद्ध सुरू होण्याचे संकेत म्हणून पाहिले जात होते. युद्ध सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले आहेत की आम्ही स्वतःचे रक्षण करू. भारताने पाकिस्तानी हद्दीवर केलेल्या हल्ल्यानंतर, एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत, पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांनी म्हटले की, जर भारताने पुढील कारवाई केली नाही तर आम्हीही काहीही करणार नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here