नितेश राणेंचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप

0

मुंबई,दि.23: भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. जेव्हा नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली असल्याचा खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी केला आहे. ट्वीट करत राणेंनी हा गंभीर आरोप केला आहे. याअगोदरही उद्वव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा नाकारल्याचा आरोप बंडखोर आमदार सुहास कांदेंनी केला होता.

“माझ्या वडिलांनी जेव्हा शिवसेना सोडली, तेव्हा एकनाथ शिंदेप्रमाणेच त्यांनाही मारण्यासाठी तथाकथित शांत आणि संयमी पक्षप्रमुखांकडून सुपाऱ्या देण्यात आल्या. हे ‘म्याव म्याव’ आता संपवून टाकूया आणि आपण व्याजासह वस्त्रहरण सुरु करु, असे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे.

सुहास कांदे यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशामुळेच एकनाथ शिंदे यांना सुरक्षा व्यवस्था नाकारण्यात आली असल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here