अहमदनगर,दि.२७: भाजपाचे (BJP) खासदार सुजय विखे पाटील (sujay vikhe patil) यांनी “राष्ट्रवादी काँग्रेस नवरा, शिवसेना बायको तर काँग्रेस ही जेवणापुरती आलेले वऱ्हाडी” असे म्हणत महाविकास आघाडी सरकारचं (Maha Vikas Aghadi) वर्णन केले आहे. नवऱ्यानं दुसरी सवत आणू नये म्हणून शिवसेना मूकपणे अन्याय सहन करीत आहे, तर कितीही तिरस्कार केला तरी जेवणासाठी वऱ्हाडी म्हणून आलेली काँग्रेस हटायला तयार नाही’, अशा शब्दांत भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( sujay vikhe patil ) यांनी महाविकास आघाडी सरकारचं वर्णन केलं आहे. डॉ. विखे पाटील नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीच्या कारभारावर त्यांनी सडकून टीका केली. कोणताही विचार जुळत नसताना केवळ सत्तेसाठी एकत्र आल्याचे सांगत महाविकास आघाडीला नवरा-बायको आणि वऱ्हाडींची उपमा त्यांनी दिली.
भाजप खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीच्या कारभारावर सडकून टीका केली. कोणताही विचार जुळत नसताना केवळ सत्तेसाठी एकत्र आल्याचे सांगत महाविकास आघाडीला नवरा-बायको आणि वऱ्हाडींची उपमा सुजय विखे पाटील यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अधिवेशनाच्या काळात विरोधपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या कामगिरीचे कौतूक सुजय विखे पाटील यांनी केले आहे. मागील सरकारच्या काळात राधाकृष्ण विखे पाटील विरोधीपक्ष नेते होते. त्यावेळी त्यांनी अशीच कामगिरी केली होती. दुर्दैवाने त्यावेळी काँग्रेस पक्षानं त्यांना अपेक्षित साथ दिली नाही. उलट जिल्ह्यातील काही नेत्यांनी विरोधच जास्त केला. त्यामुळंच तर काँग्रेस सोडण्याची वेळ आमच्यावर आली. असेही म्हणाले.
निर्णय घेण्याची क्षमता नाही
महाविकास आघाडी सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही. त्यांचे प्रत्येक निर्णय वादग्रस्त ठरत आहेत. त्यांना गरिबांचे हित कशात आहे, हे कळत नाही. त्याचे देणेघेणेही नाही. ग्रामीण भागातील आमदारांना मुंबईत घरे देण्याचा निर्णयही असाच आहे. या निर्णयावर काय बोलावे, हेच कळत नाही. येणाऱ्या निवडणुकीत जनताच त्यांना याचे उत्तर देईल. नवीन कामे करण्यापेक्षा केंद्र सरकारच्या कामांचे श्रेय घेण्याकडेच महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कल आहे. केंद्र सरकारच्या योजना राबविताना अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष वापरल्याचं दिसून येतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचं कौतूक करण्याचे किमान त्याचे श्रेय त्यांना देण्याचे औदार्यही या लोकांना दाखविता येत नाही, या शब्दांत सुजय विखे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे.