कोरोना काळात ताट वाजवायला लावल्याने देशात अवदसा आली: नाना पटोले

0

नाशिक,दि.18: कोरोना काळात ताट वाजवायला लावल्याने देशात अवदसा आली असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नाशिकमध्ये काँग्रेस मेळाव्यात बोलताना केंद्र सरकारवर सडकून टीका केली. कोरोना काळात परिस्थिती बाबत खासदारांच्या समितीने रिपोर्ट दिला की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारच्या चुकीमुळे मृत्यू जास्त झाले. केंद्रातील सरकार पश्चिम बंगालच्या निवडणूकित व्यस्त होते. देशाच्या सीमा बंद करण्यात आल्या नाहीत, गुजरातमध्ये गर्दी गोळा करण्यात आली. कोरोनासाठी सगळ्यांना दिवे पेटवायला लावल्याने डॉक्टरही परेशान झाले होते. ताट वाजवायला लावल्याने देशात अवदसा आली, अशी खळबळजनक टीका नाना पटोले (Nana Patole) यांनी केली.

नाशिकमध्ये काँग्रेस मेळाव्यात त्यांनी एकला चलो रेची भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते बोलत होते. काँग्रेस (Congress) असा पक्ष आहे, त्या पक्षात निवडणुकीने अध्यक्ष निवडला जातो. काँग्रेसमध्ये ही निवडणुकीची प्रक्रिया होते त्यातून सगळ्यांना जावं लागत. पक्षांतर निवडणुका होतात. कधी बिनविरोध होतात तर कधी निवडणूक प्रक्रिया होते, त्यातून सगळ्यांना जावं लागते. त्यामुळे काँग्रेस स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार यात शंका नाही. सर्व कार्यकर्त्यांची हीच भावना असून कार्यकर्ता हाच पक्षाचा मुख्य घटक असल्याने काँग्रेसची देखील हीच भूमिका असल्याचे पटोले म्हणाले.

कोरोना जाणून बुजून देशात आणला. कोरोना काळात परिस्थिती बाबत खासदारांच्या समितीने रिपोर्ट दिला की दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारच्या चुकीमुळे मृत्यू जास्त झाले. केंद्रातील सरकार पश्चिम बंगालच्या निवडणूकित व्यस्त होते. देशाच्या सीमा बंद करण्यात आल्या नाहीत, गुजरात मध्ये गर्दी गोळा करण्यात आली. कोरोनासाठी सगळ्यांना दिवे पेटवायला लावल्याने डॉक्टरही परेशान झाले होते. ताट वाजवायला लावल्याने देशात अवदसा आली. मोठं संकट आपल्यावर आले आहे. कोरोना काळात पैसा नव्हता पण भगवान श्री रामाच्या नावाने पाच दहा हजाराच्या वर्गणी गोळा केल्या गेल्या. कुठल्याही गोष्टीची वेळ काळ असते, सध्या पितृपक्ष सुरू आहे, योग्य वेळी रामजन्मभूमीवर जाऊ. मी अयोध्येला जाणार आणि तुम्हा सगळ्यांना घेऊन जाणार असून गोळा केलेले पैसे कुठे गेले असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला.

आमच्याकडे महिलांची मोठीच ताकद असून ओबीसी भटक्या विमुक्तांना त्रास देणाऱ्यांचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. मिडीयाचे आमच्यावर अधिक प्रेम आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा देशातील 50 गावात लाईट होती. 60 वर्षात काँग्रेसने सगळ्या सुविधा कानाकोपऱ्यत पसरवल्या. शेतीमध्ये क्रांती काँग्रेसमुळे आली. मोदी ओबीसीचे असते, बहुजनाचे असते तर शेतकऱ्यांविरोधी कायदे आणले नसते. नोटबंदी हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, भाजप वाल्यांनी खूप जमिनी घेतल्या. भाजप म्हणजे चोळा मोळा कपडे आणि दुसरीकडे जाऊन जेवायचे पण नोटबंदीनंतर एवढा पैसा यांच्याकडे कुठून आला, असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here