मनोज जरांगे पाटील यांनी काँग्रेसला दिला इशारा, म्हणाले तर काँग्रेसचे सगळे उमेदवार…

0

जालना,दि.10: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात मराठा फॅक्टर खूप महत्त्वाचा ठरला. राज्यात महाविकास आघाडीला 30 जागा तर महाविकास आघाडीला 17 जागा मिळाल्या. मनोज जरांगे फॅक्टरमुळे भाजपाला राज्यात फक्त 7 जागा मिळाल्या. अनेक मतदारसंघात दिग्गज नेते पराभूत झाले.

मनोज जरांगे यांनी 8 जूनपासून पुन्हा उपोषण सुरू केले आहे. जालना येथील काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांनाही या आंदोलनाचा फायदा झाला आणि काळे यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री असलेल्या रावसाहेब दानवे यांना पराभूत करत विजय संपादन केला. या पार्श्वभूमीवर नुकतीच खासदार कल्याण काळे यांची मनोज जरांगे यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. या भेटीवेळी मनोज जरांगे यांनी काँग्रेसलाही इशारा दिला आहे.

मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या विरोधात तुमच्या नेत्यांनी वक्तव्य केलं तर मी विधानसभेला काँग्रेसचेही सर्व उमेदवार पाडून टाकेन, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. जरांगे यांच्या पहिल्या टप्प्यातील उपोषणावेळी काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जरांगे यांच्या मागणीविरोधात भूमिका घेत ओबीसी एल्गार मेळाव्यांचं समर्थन केलं होतं. या पार्श्वभूमीवर आता जरांगे यांनी काँग्रेसलाही इशारा दिला आहे. दैनिक लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here