Deepak Kesarkar दीपक केसरकरांचे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य

Deepak Kesarkar: उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती

0

मुंबई,दि.8: Deepak Kesarkar On Uddhav Thackeray: दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. आज (दि.8) शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. (Uddhav Thackeray PC) सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या संदर्भातील निकाल लवकर लागला पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच शिंदे गटाचे 16 सदस्य अपात्र होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधी निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करु नये, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

काय म्हणाले दीपक केसरकर? | Deepak Kesarkar On Uddhav Thackeray

शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्ह आणि संबंधीत विषयांवर निवडणूक आयोगाकडे आणि सुप्रीम कोर्टात केसेस सुरू आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांचे जे काही म्हणणं आहे ते त्यांनी सुप्रीम कोर्टात किंवा निवडणूक आयोगात सांगावे. केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी हे सुरू आहे. सहानुभूतीचा जोरावर जनमत मिळवून मत मिळवावी अस सुरुय. ठाकरेंना काय वाटते ते महत्वाचे नाहीय, सुप्रीम कोर्टाने असे कोणतेही आदेश दिले नाहीत. ते ठाकरेंचे का ऐकतील असा सवाल शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला आहे.

भाजपासोबत बोलणी सुरु होती, त्याचे… | Deepak Kesarkar

ठाकरेंची सुरु असलेली सगळी धडपड व्यर्थ आहे. तुम्ही जे म्हणताय ते सगळं खरं का ठरेल, लोकांना खर काय ते सांगायला हवे. भाजपासोबत बोलणी सुरु होती, त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेले आम्ही लोक आहोत. मी काय कोणी मोठा मनुष्य नाही पण मी ते घडवून आणल होत. पक्षाच हित म्हणून मी ते केले. पंतप्रधानांशी भेट घडवून आणली त्यावेळी बोलणी केली आणि ती चूक दुरुस्त करायची ती संधी होती. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते, असा गौप्यस्फोट केसरकर यांनी केला.

ठरलेल्या गोष्टी उद्धव ठाकरे यांनी केल्या नाहीत त्याप्रमाणे भूमिका घेतली नाही. कुटुंबावर जे काही आरोप झाले त्याने ते दुखावले गेले असतील पण दुखावले गेले म्हणून अस वागणे चुकीचे होते. आजसुद्धा तुम्ही सांगा की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडा आम्ही सगळे मुंबईला येऊ, असे मी तेव्हाही सांगितले होते. पंतप्रधान आणि बाळासाहेब यांच्यात एक वेगळे बॉंडिंग होते, असे केसरकर म्हणाले.  

पक्ष ही कधीही कोणाची खाजगी प्रॉपर्टी नसते. बाळासाहेब होते त्यावेळी कधीही निवडणूक होत नव्हती. पक्ष हा कुठल्यातरी कुटुंबाची खाजगी प्रॉपर्टी अस त्यांनी म्हणणं निवडणूक आयोगाकडे लिहून द्यावे. आपल्या घराला लागलेली आग आधी विझवायला लागते. मुख्यमंत्री तुम्हीच रहा पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडा अस म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंची पण तुम्ही दखल घेतली नाहीत. उद्धव ठाकरे दिल्लीवरून कबूल करून आले होते की मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो पण त्यांनी तस केलं नाही, असा आरोप केसरकर यांनी केला. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here