महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर 

0

मुंबई,दि.15: मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक तारखा जाहीर केल्या. महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीच्या तारखांवर अनेक दिवसांपासून सुरू असलेला सस्पेन्स आज संपला आहे. निवडणूक आयोग आज दोन्ही राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 तारखेला निकाल लागणार आहेत.

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 22 ऑक्टोबरपासून सुरु होईल. उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करु शकणार आहेत. यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर 4 नोव्हेंबर 2024 ला पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल, अशी महत्वाची माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली.

झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. झारखंडमध्ये 13 नोव्हेंबरला निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडेल. तर 20 नोव्हेंबरला निवडणुकांचा दुसरा टप्पा पार पडेल. विशेष म्हणजे येत्या 23 नोव्हेंबरला झारखंडमध्ये मतमोजणी केली जाणर आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत आणि कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी 145 जागांची आवश्यकता असेल. झारखंडमध्ये विधानसभेच्या 81 जागा आहेत आणि कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी 42 जागांची आवश्यकता असेल.

आगामी निवडणुकीत सर्व बुथवर सुविधा मिळाव्यात यासाठी निवडणूक आयोगाकडून रांगांच्या जवळपास बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.  

85 वर्षांवरील मतदारांची संख्या 12.48 लाख इतकी आहे तर 100 किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांची संख्या 49034 इतकी आहे. 18-19 वर्षांच्या आणि पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांची संख्या 19.48 लाख इतकी आहे.

यूपीबद्दल बोलायचे तर, ज्या 10 जागांवर पोटनिवडणूक होणार आहे त्यात मैनपुरीचे करहाल, कानपूरचे सिसामऊ, प्रयागराजचे फुलपूर, आंबेडकर नगरचे कटहारी, मिर्झापूरचे माझवान, अयोध्येचे मिल्कीपूर, गाझियाबाद सदर, अलीगढचे खैर, मीरापूरचे मीरापूर यांचा समावेश आहे. मुझफ्फरनगर आणि मुरादाबादचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी एकूण मतदारसंघ 288 आहेत. 25 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी तर 29 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे.  महाराष्ट्रात एकूण 9.59 कोटी मतदार आहेत. यामध्ये 4.95 कोटी पुरुष मतदार आहेत तर 4.46 कोटी महिला मतदार आहेत. तृतीयपंथी मतदारांची संख्या 5997 इतकी आहे तर दिव्यांग मतदारांची संख्या 6.32 लाख इतकी आहे. 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 12.48 लाख इतकी आहे तर 100 किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांची संख्या 49034 इतकी आहे. 18-19 वर्षांच्या आणि पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांची संख्या 19.48 लाख इतकी आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here