सोलापूर,दि.१३: पाकिस्तानने भारताच्या हवाई हल्ल्यात नुकसान झाल्याचे मान्य केले आहे. (Pakistan Suffers Huge Losses Due To Indian Attack) भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात पाकचे मोठे नुकसान झाले आहे. पाकचे अनेक सैनिक ठार झाले आहेत. मात्र पाकने मृतांचा आकडा कमी करून जाहीर केला आहे. पाकिस्तानने आता हे मान्य केले आहे की भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत त्यांचे ११ सैनिक मारले गेले आणि ७८ जवान जखमी झाले. याशिवाय, गोळीबारात ४० नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. यासोबतच, पाकिस्तानने हे देखील मान्य केले आहे की भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यात पाकिस्तानी हवाई दलाचेही मोठे नुकसान (Loss of Pakistan) झाले आहे.
त्याच वेळी, भारतीय लष्कराने प्रत्युत्तराच्या कारवाईनंतर दिलेल्या माहितीत स्पष्टपणे म्हटले होते की ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० दहशतवादी मारले गेले आणि त्यानंतर झालेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानी लष्कराचे ४० सैनिक आणि अधिकारी मारले गेले. (Loss of Pakistan Marathi News)

पाकिस्तानी माध्यमांनुसार, पाकिस्तानी लष्कराने मंगळवारी भारतासोबत झालेल्या अलीकडील चकमकीत झालेल्या लष्करी आणि नागरिकांच्या हानीची अधिकृत माहिती जाहीर केली. इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) नुसार, ६ आणि ७ मे रोजी भारतीय कारवाईला प्रत्युत्तरा दरम्यान देशाचे रक्षण करताना ११ सैनिक ठार झाले आणि ७८ जवान जखमी झाल्याचे पाकने म्हटले आहे.
हवाई दलाचेही मोठे नुकसान | Loss of Pakistan
आयएसपीआरने सांगितले की, भारतीय हल्ल्यात नाईक अब्दुल रहमान, नाईक वकार खालिद, लान्स नाईक दिलावर खान, इक्रामुल्ला, शिपाई आदिल अकबर आणि शिपाई निसार हे सहा लष्करी जवान ठार झाले आहेत.
आयएसपीआरने असेही मान्य केले आहे की भारतीय हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी हवाई दलाचेही मोठे नुकसान झाले आहे, ज्यामध्ये पाच हवाई दलाचे अधिकारी ठार झाले आहेत. त्यामध्ये स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसूफ, चीफ टेक्निशियन औरंगजेब, सिनियर टेक्निशियन नजीब, सिनियर टेक्निशियन मुबाशिर आणि कॉर्पोरल टेक्निशियन फारूक यांचा समावेश आहे.