Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप

Kirit Somaiya: न्यायालयात खोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा किरीट सोमय्या यांचा दावा

0

मुंबई,दि.18: भाजपाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना आज सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी किरीट सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी न्यायालयात खोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.

काय म्हणाले किरीट सोमय्या?

किरीट सोमय्या यांनी आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नील सोमय्या आणि आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांना किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोर्टात खोटी शपथपत्र दिली गेली. बोगस तक्रारदार उभे करण्यात आले. ज्या व्यक्तीने तक्रार दिली तो माणूसच अस्तित्वात नाही. त्याचा फोनही लागत नसल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

दरम्यान त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे हे खोटारडे मुख्यमंत्री होते. तक्रार घेण्यासाठी पोलीस आयुक्तांवर उद्धव ठाकरे यांनी दबाव टाकला, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. कोर्टात खोटी शपथपत्र देण्यात आली. बोगस तक्रारदार उभे करण्यात आले असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे. दरम्यान सोमय्या यांच्या या आरोपांना आता ठाकरे गट काय उत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here