Kirit Somaiya: नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजपा नेते किरीट सोमय्यांचा गौप्यस्फोट

0

मुंबई,दि.23: Kirit Somaiya: महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे.

तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. ही बातमी बाहेर येताच सकाळीच राज्यात खळबळ उडाली. यावर आता राजकीय, सामाजिक अशा विविध स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान मलिकांच्या ED अटकेनंतर भाजपचे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक गौप्यस्फोट केला आहे.



आधी अनिल देशमुख, नवाब मलिकांनंतर आता तिसरा नंबर अनिल परबांचा. असा दावा भाजपचे किरीट सोमय्या यांनी केलाय.ठाकरे सरकारने कितीही दादागिरी, माफियागिरी केली तरी उद्धव ठाकरेंच्या घोटाळेबाजांना आम्ही सोडणार नाही, महाराष्ट्र घोटाळेमुक्त करणारच अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्यांनी दिली आहे. दरम्यान अनिल देशमुख नंतर आत्ता नवाब मलिक जेल मध्ये, अनिल परब यांनाही आता हिशोब द्यावा लागणार असे सांगत ट्विट केलंय.

नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांना आक्रमक प्रत्युत्तर देत आव्हान दिलं होतं. एनसीबीच्या कारवाईवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यावरून भाजप आणि मलिक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मलिकांवर गंभीर आरोप केले होते. अशातच आता मंत्री नवाब मलिक यांचं कारस्थान हळूहळू जनतेसमोर येत आहे, असं म्हणत किरीट सोमय्या यांनी नवाब मलिकांवर टीका केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here