काश्मिरी पंडितांचे आज जे पलायन सुरु आहे, हत्या सुरु आहेत त्यावर ‘काश्मीर फाईल्स २’ काढावा: संजय राऊत

0

मुंबई,दि.३: काश्मिरी पंडितांचे आज जे पलायन सुरु आहे, हत्या सुरु आहेत त्यावर ‘काश्मीर फाईल्स २’ काढावा असे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. मंदिरांसाठी संघर्ष करण्यापेक्षा काश्मिरी पंडितांचे प्राण कसे वाचवता येतील हे पाहणे गरजेचे आहे. असेही संजय राऊत म्हणाले. इतर पक्षाच्या राजवटीत हे झाले असते तर भाजपने काश्मिरी पंडित, हिंहुत्वाच्या नावे संपूर्ण देशभर गोंधळ घातला असता.

ज्ञानवापी प्रकरण श्रद्धेचा विषय असून न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी सांगितले आहे. तसेच प्रत्येक मशिदीत ‘शिवलिंग’ शोधण्याची, दरदिवशी नवा वाद निर्माण कऱण्याची गरज नाही, या शब्दांत मोहन भागवत यांनी कान टोचले आहेत. मोहन भागवत यांच्या या भूमिकेला शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पाठिंबा दिला असून, मंदिरांसाठी संघर्ष करण्याऐवजी काश्मिरी पंडितांचे प्राण कसे वाचवता येतील, हे पाहणे गरजेचे असल्याचे सांगत केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

मोहन भागवत बरोबर बोलले. मोहन भागवत यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. मंदिरांसाठी संघर्ष करण्यापेक्षा काश्मिरी पंडितांचे प्राण कसे वाचवता येतील हे पाहणे गरजेचे आहे. या देशात अनेक राज्यात आणि खासकरुन जम्मू काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित, तेथील नागरिक अत्यंत धोक्याखाली आहेत. घरात, कार्यालयात घुसून त्यांना रोज मारले जात आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. 

स्थिती फार गंभीर आहे

काश्मीरमधील स्थिती फार गंभीर आहे. पण आज १९९० मध्ये होती तशीच स्थिती निर्माण झाली आहे. तुम्ही काश्मिरी पंडितांच्या घऱवापसीबद्दल सांगितलं होतं आणि त्यावर हिंदुत्वाच्या नावे मतंही मिळवली होती. पण कलम ३७० हटवल्यानंरही काश्मिरी पंडित, तेथील जनतेच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. तसेच कश्मीर फाईल्स चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले. पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या कृपेने निर्मात्याने ४००, ५०० कोटी कमावले. पण काश्मिरी पंडितांच्या नशिबी पलायनच आहे. खरे तर आज जे पलायन सुरु आहे, हत्या सुरु आहेत त्यावर ‘काश्मीर फाईल्स २’ काढावा आणि यासाठी जबाबदार कोण हे समोर यावे, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. 

देशभर गोंधळ घातला असता

सरकारकडून सुरक्षेची कोणतीही व्यवस्था करण्याता आलेली नाही. इतर पक्षाच्या राजवटीत हे झाले असते तर भाजपने काश्मिरी पंडित, हिंहुत्वाच्या नावे संपूर्ण देशभर गोंधळ घातला असता. पण गृहमंत्री, पंतप्रधान, जम्मू काश्मीरमध्ये राज्य तुमचे असतानाही काश्मिरी पंडित जीव गमावत आहेत किंवा पलायन करत आहेत हे भयानक आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here