सोलापूर जिल्ह्यातील या दुष्काळग्रस्त गावांची केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाकडून पाहणी

0

सोलापूर,दि.14: दुष्काळामुळे झालेल्यानुकसानीची पाहणी करताना केंद्रीय पथकाकडे करमाळा तालुक्याच्याघोटी, वरकुटे, नेरले व सालसे या गावातील शेतकऱ्यांनी जिल्ह्यात कमीपाऊस झाल्याने खरीप व रब्बी या दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसानझालेले असून, शेतकऱ्यांच्या हातात काहीही पीक आलेले नाही, हेसांगत असताना अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यातून आसवे थांबत नव्हते. दुष्काळी परिस्थितीची दाहकता व त्यामुळे झालेले शेतकऱ्यांचे अतोनातनुकसान याची दखल घेऊन शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीरकरावी, अशी मागणी सर्व ठिकाणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती.

यावर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने राज्य शासनानेमाळशिरस, बार्शी, सांगोला, माढा व करमाळा या पाच तालुक्यात तरजिल्ह्याच्या उर्वरित तालुक्यातील 45 महसूल मंडळात दुष्काळ जाहीरकेलेला आहे. केंद्र शासनाकडून ही दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगानेशेतकऱ्यांना मदत देण्यात येते. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुष्काळीपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी दोन सदस्य केंद्रीय पाहणी पथकसोलापूर जिल्हा दौऱ्यावर आलेले असून पथकाने आज करमाळातालुक्यातील घोटी, वरकुटे, नेरले व सालसे या गावातील दुष्काळीस्थितीची पाहणी केली व शेतकऱ्यांची संवाद साधला.

या दुष्काळ पाहणी पथकात केंद्र शासनाच्या पाणी पुरवठा वस्वच्छता विभागाचे अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरण व केंद्रीय अन्नव सार्वजनिक वितरण विभागाच्या उपसचिव श्रीमती सरोजिनी रावतयांनी करमाळा तालुक्यातील घोटी, वरकुटे, नेरले व सालसे गावातीलशेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन रब्बी पिकांची पाहणी केली. तसेचशेतकऱ्यांशी संवाद साधत असताना खरीप पिकाच्या नुकसानीचीहीमाहिती त्यांनी जाणून घेतली. दुष्काळ पाहणी पथकातील सदस्यांशीसंवाद साधत असताना अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. खरीप व रब्बी हंगामातील सर्व पिके नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्याहाती आलेली नाहीत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांचे आर्थिक नुकसानझालेले आहे.

बुधवार दिनांक 13 डिसेंबर रोजी केंद्रीय पथकाने माळशिरस वसांगोला तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेटी देऊन तेथीलदुष्काळाच्या तीव्रतेची तसेच नुकसान झालेल्या तूर, मका, ज्वारी, डाळिंब पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या शेतातील सिंचन विहिरीतसेच शासनाच्या जलसंपदा विभागाकडील पाझर तलावाची ही प्रत्यक्षपाहणी केली व या भागातील पाण्याची व चाऱ्याची सद्य परिस्थिती वशेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची ही माहिती त्यांनी जाणूनघेतली.

केंद्रीय पथकाच्या या दोन दिवसाच्या दौऱ्यात प्रभारी जिल्हाअधिक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी जिल्ह्यातील टंचाईच्यापरिस्थितीची तसेच यामुळे झालेल्या खरीप व रब्बी पिकाच्यानुकसानीची माहिती दिली.

यावेळी माळशिरस उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, माढाउपविभागीय अधिकारी ज्योती आंबेकर, कृषी उपसंचालक तथा प्रभारीजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे, जिल्हा परिषदेचे कृषीविकास अधिकारी पी. के. वाघमोडे, सोलापूर लाभ क्षेत्र विकासप्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता धीरज साळी, जिल्हा पुरवठाअधिकारी संतोष सरडे, उपजिल्हाधिकारी रोहयो चारुशीला देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. समीर बोरकर, वरिष्ठ भुवैज्ञानिकभुजल सर्वेक्षण अधिकारी एम. ए .जे शेख, जिल्हा पशुसंवर्धनअधिकारी डॉ. एन एस नरळे यांच्यासह करमाळा तहसीलदार शिल्पाठोकडे, गटविकास अधिकारी देवा सारंगकर, उपविभागीय कृषीअधिकारी शहाजी कदम, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे तसेचग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

केंद्रीय पथकाचा दोन दिवसाचा दौरा कार्यक्रम

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठीआलेल्या केंद्रीय पथकाने बुधवार 13 डिसेंबर रोजी माळशिरसतालुक्यातील सुळेवाडी व शिंगोर्णी तर सांगोला तालुक्यातीलआचकदाणी, महूद बुद्रुक या गावातील दुष्काळी परिस्थितीची पाहणीकेली. तर 14 डिसेंबर रोजी करमाळा तालुक्यातील घोटी, वरकुटे, सालसे व नेरले या गावातील दुष्काळी परिस्थितीचीपाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणूनघेतल्या. केंद्रीय पथकाकडून या पाहणीचा अहवाल केंद्र शासनालासादर झाल्यानंतर त्या अहवालानुसार केंद्र शासन आपली मदत जाहीर करू शकते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here