सोलापूर,दि.१५: Imtiaz Jaleel Solapur | MIM पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत सोलापुरात मोठे वक्तव्य केले आहे. (Imtiaz Jaleel On Uddhav Thackeray) शनिवारी (दि.१४) जलील हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहराध्यक्ष फारुक शाब्दी, निरीक्षक अन्वर सादात, शौकत पठाण, अजहर हुंडेकरी यावेळी उपस्थित होते.
इम्तियाज जलील यांचे उध्दव ठाकरे यांच्याबाबत सोलापुरात मोठे वक्तव्य | Imtiaz Jaleel Solapur
शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे जातीय राजकारण करायचे, परंतु शिवसेनेचे सध्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे सर्वांना घेऊन जातात, त्यांच्याकडून जातीय राजकारण होताना दिसत नसल्याचेही इम्तियाज जलील म्हणाले. एखादी घटना किती वाईट असू शकते हे सोलापूर औद्योगिक वासाहत येथील परिस्थिती बघितल्यावर दिसून येते, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि प्रमुख राज ठाकरे यांच्याबाबत काय म्हणाले जलील? | Imtiaz Jaleel On Uddhav And Raj Thackeray
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र यावे,असे सांगतानाच देशातून भाजपाला हद्दपार करण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येणे काळाची गरज असल्याचेही इम्तियाज जलील म्हणाले.
महानगरपालिका निवडणुकीत सोलापुरात एमआयएम पक्ष कोणासोबतही युती करणार नाही. जेव्हा आम्ही महाविकास आघाडीकडे युतीसाठी हात पुढे करतो,तेव्हा ते सहकार्य करत नाहीत. जेव्हा त्याचा पराभव होतो,तेव्हा ते पराभवाचे खापर एमआयएम पक्षावर फोडत युतीसाठी हात पुढे करतात असे जलील म्हणाले.