छत्रपती संभाजीनगर,दि.30: एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी इम्तियाज जलील यांचे उध्दव ठाकरे यांच्याबाबत मोठं विधान केले आहे. भाजपा नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात 45 जागा जिंकण्याचा नारा दिला होता. यावरही जलील म्हणाले, आमचे इतरांशी वैचारिक मतभेद आहेत.पण महाराष्ट्रमध्ये त्यांनी सगळ्यात मोठी चूक केलेली आहे. मराठी लोकांमध्ये भाजपने जे एक तेढ निर्माण करण्याचे सर्वात मोठे पाप केले आहे. TV9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.
उद्धव ठाकरेंसोबत अल्पसंख्याक समाज गेल्याचे चित्र आहे असे अजित पवारांनी सांगितले होते. महाराष्ट्रात ठाकरे यांच्याबत सहानुभूती होती असे अनेकांचे म्हणणे होते. इम्तियाज जलील म्हणाले, “उद्धव ठाकरेंसोबत अनेक लोक हे गेले आहेत, काँग्रेस सोबत गेले नाहीत. आता आम्हालाही बघायला मिळत आहे. शिवसेनेत फूट पाडण्याचे काम देखील भाजपने केलं आहे. मात्र लोक आता हुशार झाले आहेत. लोकसभेच्या निकालानंतर देशात काय होईल माहित नाही. पण महाराष्ट्रात आपल्याला नक्कीच वेगळे चित्र पाहायला मिळेल.”
भारतातला सर्वात मोठा जल्लोष छत्रपती संभाजीनगरमध्ये होईल. मी सर्वांना त्यासाठी आमंत्रण देतो. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक निवडणुकीत उभे राहतात. निवडणुकीतील सुधारणा होत नाही तोपर्यंत असेच सुरू राहील. असेही जलील म्हणाले.
भाजपने जे काही दावे केले. त्यातील 50% तरी त्यांनी जागा जिंकल्या तर त्यांनी खूप काही समाधान मानावं लागेल, असं इम्जियाज जलील यांनी म्हटलं आहे.