तुम्हाला फटाक्यांचा त्रास होतो तर आम्हाला रोज भोंग्याचा किती त्रास होत असेल, मनसेचा इशारा

0

मुंबई,दि.२५: दिवाळीतील फटाक्यावरून मनसेचे मनोज चव्हाण यांनी भोंग्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना मनसेने मशिदींवरील भोंग्यावरून आंदोलन सुरू केले होते. मशिदींवरील भोंगे हे नियमांचे पालन करूनच लावले पाहिजेत अशी भूमिका मनसेने घेतली होती. मनसेने काही महिन्यांपूर्वी आंदोलन करत उपस्थित केलेला मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

दिवाळीतील फटाक्यांमुळे त्रास होत असल्याची तक्रार काही मुस्लीम व्यक्तींनी केल्यानंतर मनसेने त्यांना जाहीर इशाराच दिला आहे. मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी हिंदूंनी एकटवण्याचं आवाहन केलं असताना, अमेय खोपकर यांनी तर त्रास होत असेल तर देश सोडून निघून जा असं सुनावलं आहे.

ट्विटरला एका मुस्लीम व्यक्तीने पोलिसांना टॅग करत रात्रीच्या वेळी फटाके वाजत असल्याची तक्रार केली होती. सलमान खान नावाच्या व्यक्तीने रात्रीचे दोन वाजले तरी कांदिवलीतील गणेश नगर येथे फटाके फोडले जात असल्याचं ट्वीट करत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये केनिल नावाच्या व्यक्तीने पहाटे ४.३० वाजता फटाके फोडले जात असल्याची तक्रार केली होती. मुंबई पोलिसांनी या दोन्ही ट्वीटरला उत्तर देत संबंधितांना कळवण्यता आल्याचं सांगितलं होतं.

मनोज चव्हाण यांनी या ट्विटचे स्क्रीनशॉट शेअऱ केले असून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “विचार करा मग आम्हाला भोंग्यांचा रोजचा किती त्रास होत असेल. आज तुम्हाला आमच्या फटाक्यांचा त्रास होत आहे. आम्ही रोज फटाके फोडत नाही, मात्र तुमची अजान अजूनही अनेक ठिकाणी भोंग्यावर सुरू आहे. थोडं सहन करा कारण दिवाळी आहे,” असं ते म्हणाले आहेत.

“ज्या कुणाला फटाक्यांचा त्रास होत असेल त्यांनी बॅगा भरायच्या आणि लगेच मुंबई काय, देश सोडून निघून जायचं. अशा हिंदूद्वेष्ट्या मुसलमानांनी आमच्या देशात राहायची गरजच नाही. आमचा सण आहे, आम्ही फटाके वाजवणारच. आम्ही वर्षानुवर्षं भोंग्यांचा त्रास सहन करतोय ना, मग तुम्ही चार दिवस फटाके सहन करा,” असं ट्वीट अमेय खोपकर यांनी केलं आहे.

“ट्विट पाहून माझी तळपायाची आग मस्तकात गेली. देवाच्या नावाखाली वर्षानुवर्ष आम्ही यांचे अजान ऐकत आहोत, आम्ही ते सहन करतोय ना. दिवाळी तर फक्त चार दिवस असते. काल पहिला दिवस असल्याने पहाटे लोक उठणारच. त्यांना इतका त्रास होत असेल तर त्यांच्या अजानचा आम्हाला किती त्रास होतो हे पाहिलं पाहिजे. माझा विषयच हा होता की, जसे हे सगळे एकत्र येतात आणि पोलिसांना ट्वीट करणं वैगेरे गोष्टी करतात. तशाच प्रकारे हिंदूही एकवटणं गरजेचं आहे. आपण एकवटलो तरच प्रत्युत्तर देता येईल,” असं मनोज चव्हाण यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here