दोन निवडणुकांचा खर्च मोजला आणि महागाई भत्ता जोडला: भाजपा खासदार जनार्दन मिश्रा

0

“मी 15 लाखांपर्यंतचा भ्रष्टाचार मानत नाही”: खासदार जनार्दन मिश्रा

MP Janardhan Mishra: सरपंच निवडणुकीसाठी सात लाख रुपये खर्च करून सरपंच बनलेला आहे, पुढील निवडणुकीत परत 7 लाख रुपये खर्च करावे लागतील. महागाई वाढली आहे त्याचे 1 लाख रुपये धरले तर पंधरा लाख रुपये झाले. त्यामुळे “मी 15 लाखांपर्यंतचा भ्रष्टाचार मानत नाही, दोन निवडणुकांचा खर्च मोजला आणि महागाई भत्ता जोडला” असे वक्तव्य भाजपचे खासदार जनार्दन मिश्रा (BJP MP Janardan Mishra) यांनी केले आहे.

भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते 15 लाख रुपयांपर्यंतचा भ्रष्टाचार चुकीचा नाही असे म्हणताना दिसत आहेत. स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराच्या गप्पा मारणाऱ्या भाजप नेत्याचे असे वक्तव्य चर्चेचा विषय बनले आहे.

मध्य प्रदेशातील रीवा येथील भाजप खासदार जनार्दन मिश्रा त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील रीवा येथे एका कार्यक्रमात गेले होते. त्याच प्रसंगाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात ते म्हणत आहेत, “पंचायतीच्या सरपंचाने निवडणुकीत लाखो खर्च केले नाहीत तर तो निवडणूक जिंकू शकत नाही.

ते म्हणाले, “मागील निवडणुकीत त्यांनी (सरपंच) 7 लाख खर्च केले, पुढच्या निवडणुकीत फक्त 7 लाख खर्च होतील. यावर महागाई वाढली तर आणखी एक लाखाची भर पडेल. अशा परिस्थितीत जेव्हा लोक सरपंचावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात.
त्यामुळे मी त्यांना गंमतीने सांगतो की 15 लाखांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप असेल तर तुम्ही सांगा.

एखाद्या सरपंचाने 15 लाख रुपयांपर्यंतचा भ्रष्टाचार केला असेल, तर मला सांगू नका. लाखो रुपये गुंतवून त्यांनं निवडणूक लढलेली असते. पुढील निवडणुकीसाठीही त्यांना पैशांची गरज आहे. त्यामुळे कोणत्याही सरपंचाने 15 लाखांहून अधिकचा भ्रष्टाचार केला तर तो चुकीचा आहे, असं अजब विधान जनार्दन मिश्रा यांनी केलं आहे.

15 लाख रुपये पर्यंतची तक्रार नको

भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांनी व्हिडीओमध्ये “गावातील सरपंचाने भ्रष्टाचार केला, अशी तक्रार घेऊन नागरिक जेव्हा माझ्याकडे येतात, तेव्हा मी त्यांना म्हणतो की, त्यांनी 15 लाखांपर्यंतचा भ्रष्टाचार केला असेल, तर कृपया आमच्याकडे तक्रार करू नका. जर सरपंचाने 15 लाखांपेक्षा अधिक भ्रष्टाचार केला असेल, तर त्याला आपण भ्रष्टाचार म्हणू शकतो. कारण सरपंचाने निवडणुकीत 7 लाख रुपये गुंतवलेले असतात. तसेच पुढील निवडणुकीसाठी त्याला आणखी 7 लाखांची गरज असते. महागाई वाढली तर आणखी 1 लाख जोडा. त्यामुळे ते 15 लाख रुपयांचा घोळ करत असतील, तर त्याला भ्रष्टाचार म्हणता येणार नाही. हीच समाजाची सद्यस्थिती आहे” असं म्हटलं आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here