कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान

0

जालना,दि.10: कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत (Corona Fourth Wave) आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी (Rajesh Tope) यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्रात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. रुग्णसंख्या सध्या वाढत असताना परिस्थिती मात्र नियंत्रणात आहे. मात्र अशा स्थितीतही चौथी लाट येण्याचा धोका मात्र कायम आहे. कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. जून, जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट येऊ शकते असं राजेश टोपे म्हणाले आहेत. लसीकरणाचं प्रमाण वाढवणं हेच राज्यासमोरील आव्हान असल्याचंही राजेश टोपे म्हणाले आहेत. जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी चौथ्या लाटेपासून दूर राहायचं असेल तर लसीकरण करण्याचं आवाहन केलं आहे.

“जून, जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट जास्त जीवघेणी ठरत असल्याचं वाटलं तर लसीकरणच तारणहार असणार आहे. लसीकरणाचं प्रमाण वाढवणं महाराष्ट्रासमोर महत्वाचं काम असणार आहे. आरोग्य विभाग याबाबतीत अत्यंत सजग आणि जागरुक राहून लसीकरणाचं काम करत आहे,” असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ापासून मुंबईतील कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. मुंबईतील बाधितांचे प्रमाण तर आता दोन टक्क्यांच्याही वर गेले आहे. त्यामुळे आता कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here