Gopal Kesavat: काँग्रेस नेते माजी मंत्री गोपाल केसावत यांच्या मुलीचे अपहरण

Gopal Kesavat Rajasthan News: माजी राज्यमंत्री गोपाल केसावत (Gopal Kesavat) यांची मुलगी अभिलाषा केसावत हीचे अपहरण करण्यात आले आहे

0

जयपूर,दि.23: Gopal Kesavat Rajasthan: काँग्रेस नेते आणि माजी राज्यमंत्री गोपाल केसावत (Gopal Kesavat) यांच्या मुलीचे राजस्थानची राजधानी जयपूरमधून अपहरण करण्यात आले. काँग्रेस नेते गोपाल केसावत यांनी प्रतापनगर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या तपासात सीएएसटी आणि डीएसटीच्या पथकाने तपास सुरू केला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, काँग्रेस नेत्याची 21 वर्षीय मुलगी अभिलाषा केसावत (Abhilasha Kesavat) हिचे प्रतापनगर पोलीस स्टेशन परिसरातून अपहरण करण्यात आले आहे. गोपाळ केसावत यांनी सांगितले की, सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांची मुलगी भाजी घेण्यासाठी गेली होती.

संध्याकाळी सहा वाजता त्यांना फोन आला की पप्पा काही मुले माझ्या मागे लागले आहेत. ताबडतोब गाडी घेऊन या. यानंतर गोपाल केसावत तात्काळ घटनास्थळी पोहोचले, पण मुलगी किंवा तिची स्कूटी तिथे आढळून आली नाही. त्यांच्या मुलीचा मोबाईलही बंद येत आहे.

चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

गोपाल केसावत यांनी प्रताप नगर पोलिस ठाण्यात मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर काँग्रेस नेते गोपाल केसावत यांनी प्रताप नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गोपाल केसावत यांनी जयसिंग, विजेंदर, देवेंद्र आणि राधा या चार जणांवर मुलीचे अपहरण केल्याचा आरोप केला. त्यांनी चौघांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या चौघांनी काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप गोपाल केसावत यांनी केला आहे.

विमानतळाजवळ मुलीची स्कूटी सापडली

प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने तातडीने शोधमोहीम सुरू केली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि मंगळवारी सकाळी अभिलाषाची स्कूटी विमानतळाजवळ सापडली. पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अभिलाषाचा शोध घेत आहेत.

यापूर्वीही झालेत हल्ले

गोपाल केसावत हे मागील गेहलोत सरकारमध्ये भटक्या विमुक्त विभागाचे अध्यक्ष होते. मिळालेल्या माहितीनुसार, वैयक्तिक वैमनस्यातून त्यांच्यावर यापूर्वी अनेकदा हल्ले झाले आहेत. गोपाल केसावत यांनी सांगितले की, त्यांनी 2014 मध्ये ड्रग्जच्या विरोधात मोहीम उघडली होती. त्यामुळे माझे अनेकांशी वैर आहे. राजकीय द्वेषामुळे दोन वर्षांपूर्वीही संपूर्ण कुटुंबालाच धोका असल्याने तत्कालीन डीजीपींनी सुरक्षेची मागणी केली होती. तीन महिन्यांपूर्वीही माझ्या घरावर हल्ला झाला होता. माझ्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या होत्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here