समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, 6 ठार

0

मुंबई,दि.29: मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. दोन कारच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन कार एकमेकींवर धडकल्याने भीषण अपघाताची घटना शुक्रवारी रात्री जालना येथे घडली. इर्टिका आणि स्विफ्ट डिझायर कार धडकल्याने अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहून मुंबईकडे डिझेल भरून येणाऱ्या इर्टिका कारला चुकीच्या बाजूने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने हा अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की कारमध्ये बसलेले प्रवासी रस्त्याच्या कडेला पडले.

घटनेची माहिती मिळताच जालना पोलिसांनी घटनास्थळ गाठून क्रेनच्या सहाय्याने दोन्ही गाड्या बाहेर काढल्या. जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील कडवंची गावाजवळ हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here