पंढरपूरला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, पाच भाविकांचा मृत्यू

0

मुंबई,दि.16: पंढरपूरला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला आहे. डोंबिवलीहून पंढरपूरला जाणाऱ्या एका खासगी बसला पनवेलजवळ भीषण अपघात झाला असून यात पाच भाविकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 42 जण जखमी झाले असून त्यातील 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

भाविकांवर विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेलं असतानाच वाटेतच काळानं घाला घातला. मुंबई – पुणे एक्स्प्रेस मार्गावर पनवेल पासून साडेपाच किलोमीटर अंतर पुढे भाविकांना घेऊन पंढरपूरला जाणाऱ्या खाजगी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला.

ही बस मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून जात असताना बस एका ट्रॅक्टरला धडकली व त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या 20 फूट खोल खड्ड्यात पलटली. बस थेट खाली असलेल्या पाईपलाईनवरच धडकल्याने बसमधील सर्वच प्रवासी जखमी झाले. जखमींना तत्काळ पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केलं. मात्र तेथे उपचारादम्यान पाच जणांचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये एका महिलेचा व चार पुरुषांचा समावेश आहे. गुरुनाथ बापू पाटील, रामदास नारायण मुकादम, हौसाबाई पाटील अशी मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. तसेच या अपघातात ट्रॅक्टर चालक तरवेज सलाउद्दीन अहमद आणि अनोळखी इसम जागीच मयत झाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here