राज ठाकरे गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर नेमका कोणता ‘पिक्चर’ दाखवणार?

0

मुंबई,दि.2: राज ठाकरे गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर नेमका कोणता ‘पिक्चर’ दाखवणार? याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. गेल्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) गुढीपाडवा (Gudi Padwa) मेळावा आज, शनिवारी शिवाजी पार्क (Mumbai Shivaji Park) येथे होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे. राज ठाकरे यावेळी मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. याच मेळाव्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात येतेय. मनसे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांनी या तयारीचा आढावा घेतलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 9 मार्चला मनसेच्या 16 व्या वर्धापन दिनी राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, तो 2 एप्रिलला शिवतीर्थावर दाखवेन” असं सूचक वक्तव्य राज यांनी केलं होतं.

शिवाय या मेळाव्याचा एक टीझरही मनसेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार, राज ठाकरे कोणती घोषणा करणार याकडे लक्ष लागलं आहे.

आगामी मुंबई महानगरपालिकेसह इतर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नेमके काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून मनसे पुन्हा एकदा मुंबईत शक्तिप्रदर्शन करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मेळाव्यासाठीची सर्व तयारी शुक्रवारी पूर्ण झाली. मनसेच्या अनेक नेत्यांनी या ठिकाणी हजेरी लावत कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला.

राज ठाकरे यांनी 9 मार्च रोजी पुण्यात झालेल्या मनसेच्या सोळाव्या वर्धापनदिनी बोलताना आजचं भाषण केवळ ट्रेलर आहे, 2 एप्रिलला शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळाव्यात पूर्ण पिक्चर असेल, असं म्हटलं होतं. त्यानंतरच राज ठाकरेंच्या आज पार पडणाऱ्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आज गुढीपाडवा आहे. या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळवा होणार आहे. सभेला संपूर्ण राज्यातून मनसैनिकांना उपस्थित राहण्याचे आदेश पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात दिले होते. त्यामुळे आज प्रचंड गर्दी शिवाजी पार्कात होण्याची शक्यता आहे. यासाठी तयारी देखील जोरदार सुरु आहे.

राज्यात सत्ताधारी पक्षांकडून काहीच काम होत नाहीत. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना संपवण्याचे कारस्थान करत आहेत. यामध्ये सामान्य जनता मात्र मनसेकडून मदत मागत असल्याचं मत राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत मत व्यक्त केलं आणि आगामी महापालिका निवडणुकीत महाराष्ट्रात मनसेच एक सक्षम पर्याय असू शकेल, असा विश्वास सर्वसामान्यांना देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here