निवडणूक आयोगाने भाजपा आणि काँग्रेसला पाठवली नोटीस

0

नवी दिल्ली,दि.25: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाने निवडणूक उल्लंघनाच्या तक्रारींवर भाजप आणि काँग्रेसकडून उत्तर मागितले आहे. आचारसंहिता भंगाच्या तक्रारींनंतर आयोगाने भाजप आणि काँग्रेसला नोटीस पाठवली आहे. आयोगाने दोन्ही पक्षांना 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदी आणि राहुल गांधी यांच्या भाषणांबाबत निवडणूक आयोगाने ही नोटीस जारी केली आहे.

या भाषणांमध्ये आचारसंहिता पाळली गेली नसल्याचा आरोप होत आहे. भाजप आणि काँग्रेसने आयोगासमोर एकमेकांविरोधात तक्रार केली होती. 

गेल्या काही दिवसांपासून निवडणूक प्रचारादरम्यान भाजपा आणि काँग्रेस एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. गेल्या काही दिवसांबद्दल बोलायचे झाले तर, वारसा कराचा मुद्दा दोन्ही पक्षांमधील वादाचा नवा मुद्दा बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे सर्व वरिष्ठ नेते या मुद्द्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल करत आहेत. मुरैना रॅलीत पंतप्रधान मोदींनी यावर पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला. 

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जो देशासाठी सर्वात जास्त योगदान देतो, सर्वात जास्त काम करतो, सर्वात जास्त समर्पण करतो, त्याला शेवटचे ठेवण्याचे काँग्रेसचे धोरण आहे. ‘वन रँक वन पेन्शन’सारखी लष्करातील जवानांची वर्षानुवर्षे असलेली मागणी काँग्रेसने पूर्ण होऊ दिली नाही, याचे कारण हेच आहे.

ते पुढे म्हणाले की, भाजपचे सरकार येताच ‘वन रँक वन पेन्शन’ लागू करण्यात आली. सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकांच्या आरामाचीही आम्हाला काळजी वाटत होती. ज्या सैनिकांचे हात काँग्रेस सरकारने बांधले होते, त्यांनाही आम्ही मोकळे रान दिले. आम्ही म्हटलं की एक गोळी आली तर 10 गोळ्या झाडा. जर एक गोळा फेकला गेला तर 10 तोफांनी गोळीबार केला पाहिजे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here