मराठा समाजाला फक्त एकनाथ शिंदेच न्याय देऊ शकतात; मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे

0

जालना,दि.14: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण मागे घेतले. मनोज जरांगे पाटील यांनी आज सतराव्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलं. “एकनाथ शिंदे साहेबच मराठा आरक्षणाला न्याय देऊ शकतात. मराठा आरक्षण (Maratha Reservation) घेतल्याशिवाय मागे हटणार नाही आणि शिंदे साहेबांना हटू देणार नाही,” असा निर्धार मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी यांनी व्यक्त केला.

मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे

मनोज जरांगे पाटील यांनी आज सतराव्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन त्यांनी उपोषण सोडलं. यानंतर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासह इतर निर्णय धाडसाने घेतले आहेत.

शिंदेसाहेब न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनी आज समोर येऊन सिद्ध केलं.

आपण जनआक्रोश आंदोलन असं नाव या आंदोलनाला दिले. आरक्षण तुमच्या आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे.

मराठा समाजाला फक्त एकनाथ शिंदेच न्याय देऊ शकतात. राज्यातील मराठा समाजाला एकनाथ शिंदे यांची आशा आहे.

मी भारावून न जाता ,आरक्षण प्रश्नासाठी शिंदे साहेबांच्या मागेच लागणार आहे. इथून पुढच्या काळात आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

माझ्या पोरांचा घास काढू नका, सरकारला आणखी 10 दिवस वाढवून देतो.

जीव गेला तरी तुमच्या पोरांच्या पदरात आरक्षण टाकेन. शिंदे साहेब येणार म्हटले, आणि मी ही त्यांना आणून दाखवले. मी आरक्षणाबाबत मागे हटणार नाही शिंदे साहेबांना हटू देणार नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here