मुंबई,दि.10: शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली होती. निवडणुकीत एकत्र यायचे, मित्र पक्षातील लोकांच्या जागा कशा कमी येतील याची काळजी घ्यायची घ्यायची आणि हळूहळू मित्रपक्षांना संपवायचे, ही भाजपची रणनिती आहे. महाराष्ट्रात शिवसेनेत फूट कशी पडेल, अशी परिस्थिती निर्माण केली. अशीच खेळी बिहारमध्ये सुरू होण्याआधीच नितीश कुमार वेळीच सावध झाले. त्यांनी तातडीने राजीनामा दिला. आता भाजपचे नेते त्यांच्यावर टीका करत आहेत. परंतु नितीश कुमारांनी टाकलेले पाऊल शहाणपणाचे आहे, असे सांगत शरद पवार यांनी महागठबंधन करण्याच्या निर्णयाला समर्थन दिले आहे.
शरद पवार यांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “कमी आमदार असतानाही आम्ही शिवसेनाला मुख्यमंत्रीपद दिलं असून मुळात शरद पवार यांचं दुख: जरा वेगळं आहे, ते आपल्याला माहिती आहे”, असे दे म्हणाले.
हेही वाचा निवडणुकीत एकत्र यायचे आणि हळूहळू मित्रपक्षांना संपवायचे; शरद पवारांची भाजपावर टीका
“शिवसेना हा आमचा मित्रपक्ष आहे. त्यांच्याकडे 50 आमदार आहेत. तर आमच्याकडे 115 आमदार आहेत. तसेच शिवसेनेला मुख्यमंत्रीपदही दिले आहे. काल त्यांचे नऊ आणि आमचे नऊ असे 18 जणांनी शपथ मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मला असं वाटतं की शरद पवार यांचं दुख: जरा वेगळं आहे, ते आपल्याला माहिती आहे”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात चिन्हावरून वाद सुरू आहे. यासंदर्भात बोलताना, मी काँग्रेसमधून बाहेर पडताना, पक्ष आणि चिन्ह दोन्ही बदलले होते, असा टोला भाजपाला लगावला होता. त्यावरूनही देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. “ज्यावेळी शरद पवार यांनी पक्ष बदलला त्यावेळी पक्षांतर बंदी कायदा अस्थितवात नव्हता. मात्र, आता तसे कायदे अस्थितवात आहे. त्यामुळे कायदेशीर लढाई लढावी लागते. त्यामुळे ती कायदेशील लढाई एकनाथ शिंदे करत आहेत”, असेही ते म्हणाले.