मुंबई,दि.13: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेक प्रकरणी पोलिसांना महत्वाचे आदेश दिले आहेत. भाजपा नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फुले, आंबेडकर आणि कर्मवीर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत होती. चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवड शहरात शाईफेक झाली होती. यानंतर चंद्रकांत पाटील आक्रमक झाले होते.
हेही वाचा Rajratna Ambedkar | राजरत्न आंबेडकर यांची शाईफेक प्रकरणावरून मोठी घोषणा
देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिले महत्वाचे आदेश
शाईफेक घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या घटनेनंतर बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसह 11 पोलिसांना निलंबित करण्यात आले. यामध्ये एक पोलीस निरीक्षक दोन पोलीस उपनिरीक्षक आणि इतर कर्मचारी आहेत. तर शाईफेक करणाऱ्यावरही गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यानंतर सगळीकडून टीकेची झोड उठली होती. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील कारवाई मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचे कारवाई मागे घेण्याचे आदेश
मंत्री चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना आदेश दिले आहेत. यामध्ये आरोपींवर लावण्यात आलेले कलम 307 मागे घ्या. सोबतच 11 पोलिसांचे निलंबनसुद्धा रद्द करावे, असे आदेश फडणवीस यांनी पोलिसांना दिले असल्याची सुत्रांची माहिती आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. एखादा शब्द पकडून त्यांना टार्गेट करणं चुकीचं आहे. शिवाय चंद्रकांत पाटील यांनी माफी देखील मागितली आहे. माफीनंतर टार्गेट करणं चुकीचं आहे असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं होतं. फडणवीस यांनी मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला.