पावसाचं कारण सांगून मैदान सोडले,भोंग्याचे कारण सांगून देशपांडे पळाले, आयोध्येचे कंत्राट अर्धेच मिळाले: दीपाली सय्यद

0

मुंबई,दि.19: शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी मनसेवर हल्लाबोल केला आहे. बुधवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) खुलं आव्हान देणाऱ्या शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी आता पुन्हा एकदा मनसेवर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. अयोध्येतील दौऱ्यावरून राज ठाकरेंना आव्हान देताना दिपाली सय्यद यांनी “सभा घ्यायच्याच असतील, तर अयोध्येमध्ये घेऊन दाखवा. पुण्यामध्ये तर सिवसेनेचे नगरसेवक पण सभा घेतात, तेही जास्त गर्दी करून”, असं ट्वीट केलं होतं. यानंतर त्यांनी मनसेवर खोचक टीका करणारा व्हिडीओ संदेश जारी केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच पुण्यात सभा घेणार असल्याचं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्याचसंदर्भात राज ठाकरे पुणे दौऱ्यावर देखील आले होते. मात्र, अचानक ऐनवेळी त्यांची सभा पुढे ढकलण्यात आल्यामुळे त्यावरून तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता, राज ठाकरेंची सभा पुढील आठवड्याभरात होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. राज ठाकरे स्वत: सभेचं ठिकाण आणि वेळ जाहीर करणार आहेत. सभेसाठी काही ठिकाणांना पोलिसांनी परवानगी दिल्याचंही मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

मात्र, या घडामोडींनंतर दिपाली सय्यद यांनी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दिलेल्या मुन्नाभाई या उपमेचा उल्लेख करत निशाणा साधला आहे. “पावसाचं कारण सांगून मैदान सोडले..भोंग्याचे कारण सांगून देशपांडे पळाले..आयोध्येचे कंत्राट अर्धेच मिळाले.. महाराष्ट्राला मुन्नाभाईच्या नावाने मामू मिळाले”, असं दिपाली सय्यद या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here