“अशी वाटणी झाली, तर निवडणुकीत काय होईल” छगन भुजबळ

0

मुंबई,दि.१८: अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी सूचक इशारा दिला आहे. निवडणुकीत माझा पराभव करण्याबद्दल बोललं जातं. पण, माझा पराभव करणे सोडाच, तुमच्या कित्येकांचा पराभव होईल याचा अगोदर हिशेब करा. अज्ञानात राहू नका. आम्हालाही काहीतरी कळतं. एवढे वर्ष महाराष्ट्रात राजकारण करत आहे. तुम्ही म्हणाल तसं होणार का? असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे-पाटील यांना लक्ष्य केलं आहे.

अशी वाटणी झाली, तर निवडणुकीत काय होईल

“महाराष्ट्रात ५४ टक्के ओबीसी, २० टक्के आदिवाशी आणि दलित, ब्राम्हण समाज ३ टक्के आहे. हे सगळे ७७ टक्के झाले. मग राहिले किती? अशी वाटणी झाली, तर निवडणुकीत काय होईल. त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन चला,” असं भुजबळांनी म्हटलं.

“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगायचं आहे की, दोन महिने झालं मला धमकीचे फोन येतात. शिव्या दिल्या जातात. तक्रार केल्यानंतर कारवाई होत नाही. काय राज्य आहे?” अशी खंत भुजबळांनी व्यक्त केली आहे.

“ठिक-ठिकाणी गावबंदी करण्यात आली आहे. पण, लोकप्रतिनिधींचं मत जाणून घ्या. पटलं तर ठिक नाही पटलं, तर निवडून देऊ नका. मात्र, दोन-चार जण बॅनर लावतात. महाराष्ट्र काय तुमच्या सातबाऱ्यावर लिहिलाय का? पोलिसांनी हे बॅनर तातडीने काढून टाकावेत. अन्यथा कुणीतरी आमच्यासारखं उठून काठीला-काठी भिडल्यावर तुम्ही जागे होणार का?” असा सवाल भुजबळांनी पोलिसांना विचारला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here