मुंबई,दि.२८: पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप लोकांवर हल्ला करण्यात आला होता. यात २६ जणांचा मृत्यू झाला. देशभरातून याविरोधात तीव्र आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला. देशातील सर्व हिंदू-मुस्लिम संघटनांनी पाकिस्तानवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM) पक्षाचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी धर्माच्या नावावर केलेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला.
अशी कारवाई करा की…
देशाने जी कारवाई करायची ती करावी. काश्मिरी नागरिकांबद्दल जो द्वेष पसरवला जातोय तो घातक आहे. ते पुढे म्हणाले, तुम्ही पाकिस्तान वर अशी कारवाई करा की पुन्हा एकही भारतीयाचा जीव घेतला नाही पाहिजे. पाकिस्तान आपल्यापेक्षा अर्धी पिढी मागे आहे. तिथे ते साधी सुई ही बनवू शकत नाहीत. तुम्ही आमची एकी तोडू शकत नाही. असंही ते म्हणाले. (Asaduddin Owaisi On PM Modi’s Statement On Pakistan)
काश्मीरबाबत असदुद्दीन ओवैसी यांचे मोठे वक्तव्य
एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले,” देशाच्या प्रमुखांना मी मागणी करतो की त्यांनी पाकिस्तानची कोंडी करावी. आमचा देशाच्या लष्कराचे जेवढे बजेट आहे तेवढे तुमच्या देशाचे आहे. तुम्ही आम्हाला धमक्या देऊ शकत नाहीत. काश्मीर आमचा अविभाज्य भाग आहे. काश्मिरी पण आमचेच आहेत. आम्ही त्यांच्यावर संशय घेऊ शकत नाहीत. काश्मिरी नागरिकांबद्दल द्वेष पेरला जातोय. मात्र आपल्याला एक राहावंच लागेल. पाकिस्तान आयएसआयएस, एलइटी यांना हेच पाहिजे आहे की भारतात हिंदू मुस्लिम भांडण लागली पाहिजेत. आम्हाला एक राहावंच लागेल.
ओवेसी म्हणाले, ‘ते (पाकिस्तान) भारतापेक्षा अर्धा तास मागे नाहीत, तर अर्धशतक मागे आहेत.’ आपल्या सैन्याचे बजेट तुमच्या देशापेक्षा जास्त आहे. पाकिस्तानी नेत्यांनी भारताला अणुयुद्धाची धमकी देऊ नये. त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की जर त्यांनी दुसऱ्या देशातील निष्पाप लोकांना मारले तर कोणीही शांत बसणार नाही.
पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचे स्वागत
पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मालकांना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा होईल या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचे ओवेसी यांनी गुरुवारी स्वागत केले. ओवैसी म्हणाले की, त्यांचा पक्ष राष्ट्रीय हितासाठी सरकारने उचललेल्या कोणत्याही पावलाला पाठिंबा देतो. त्यांनी सरकारकडून जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही पुन्हा केली.